शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘डर के आगे जीत हैं’; संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने १७ जणांना वाचविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

गजानन वाघमारे बार्शीटाकळी : जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्हा जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. ...

गजानन वाघमारे

बार्शीटाकळी : जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्हा जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर अनेकजण पुरात अडकले होते. अशा स्थितीत गुरुवार, २२ जुलैच्या रात्री १२ वाजतापासून ते सकाळी १० वाजेपर्यंत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने जीवाची बाजी लावत रेस्क्यू करून १७ जणांचा जीव वाचविला. पथकास २५ जुलैपर्यंत ‘स्टँड बाय’ राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहेत.

अपुऱ्या साधनसुविधा असूनही एकाच रात्री पूर परिस्थितीला सामोरे जाऊन मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी कार्यतत्परता दाखवित १७ लोकांना जीवदान दिले आहे.

सात तासांच्या कालावधीत दोनद नाला, आमराई नाला, खोलेश्वर स्मशानभूमी, विद्रुपा नदी येथील ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले. त्यानंतर खडकी येथे रेस्क्यू ऑपरेशन राबवून सेठी हाईटस, श्रद्धा काॅलनी, ३० बंगले येथील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, एसडीएम डाॅ. नीलेश अपार, तहसीलदार अरखराव, संतोष अग्रवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे उपस्थित होते.

-----------------

यांनी लावली जीवाची बाजी!

पूर परिस्थिती काळात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी जीवरक्षक पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह सहकारी ऋषीकेश राखोंडे, मयूर सळेदार, विकी साटोटे, अंकुश सदाफळे, महेश साबळे, ऋतीक सदाफळे, सचिन बंड, आकाश बगाडे यांनी जीवाची बाजी लावली. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी मीना अरोरा यांनी २३ जुलै रोजी सर्व पथकाचे कौतुक केले आहे.

------------------------------------

आमची पूर्वतयारी आणि सज्जता स्टँडबाय राहते. त्यामुळे अशाप्रकारे कोणत्याही अचानकपणे उद्भवणाऱ्या आपत्कालीन घटनांविषयी तारांबळ उडत नाही. त्यामुळेच आपत्ती निवारण करून यश मिळवतो. सध्या आम्हाला रेस्क्यू साहित्यांची गरज आहे.

-दीपक सदाफळे, जीवरक्षक.