शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

‘वंचित’ची मते वाढली; पण विजयाचा बुरूज ढासळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:18 IST

गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात ‘वंचित’ची मते वाढली असली तरी एकही आमदार निवडून आला नसल्याने, विजयाचा बुरूज मात्र ढासळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत २५ वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील एक-दोन मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाने (वंचित बहुजन आघाडी) विजय मिळविला आहे; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात ‘वंचित’ची मते वाढली असली तरी एकही आमदार निवडून आला नसल्याने, विजयाचा बुरूज मात्र ढासळला आहे.गत १९९४ ते २०१४ या २५ वर्षांच्या कालावधीत झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाने (वंचित बहुजन आघाडी) जिल्ह्यातील एक ते दोन मतदारसंघात विजय मिळविला. त्यामुळे सतत २५ वर्षे जिल्ह्यात या पक्षाचे एक-दोन आमदार राहिले आहेत. त्यामध्ये १९९४ मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून मखराम पवार, १९९९ मध्ये बोरगाव मंजू मतदारसंघातून डॉ. डी. एम. भांडे व अकोट मतदारसंघातून रामदास बोडखे, २००४ मध्ये बोरगाव मंजू मतदारसंघातून हरिदास भदे, २००९ मध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून हरिदास भदे व बाळापूर मतदारसंघातून बळीराम सिरस्कार आणि २०१४ मध्ये बाळापूर मतदारसंघातून बळीराम सिरस्कार विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला विजय मिळविता आला नाही. अकोट, बाळापूर, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या चार मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अटीतटीची लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये ५५ हजार ६५८ मतांची वाढ झाली असून, गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १२ हजार ९६ मतांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची मते वाढली असली तरी गत २५ वर्षांनंतर या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ‘वंचित’चा एकही आमदार निवडून आला नसल्याने, विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा बुरूज मात्र ढासळल्याचे वास्तव आहे.२०१४ च्या निवडणुकीतअशी मिळाली होती मते!४२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत भारिप बहुजन महासंघाला (वंचित बहुजन आघाडी) १ लाख ९० हजार २७९ मते मिळाली होती.४त्यानंतर गत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला २ लाख ३३ हजार ८४१ मते मिळाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पाचही मतदारसंघांत ‘वंचित’ला २ लाख ४५ हजार ९३७ मते मिळाली.गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये वाढ झाली. अपेक्षेप्रमाणे विजय मिळाला नसून, पाचही मतदारसंघांत पराभव झाला. त्यामध्ये अकोट, बाळापूर, अकोला पूर्व व मूर्तिजापूर चार मतदारसंघांत महाआघाडीमुळे वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला आहे.-राजेंद्र पातोडे,प्रदेश प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी.

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019