शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

अकोला जिल्ह्यातील ३७ गावांना अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 10:25 AM

जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यातून आजार पसरण्याचे प्रमाण जास्त असते. अशातच जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असून, आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या पावसाळा असल्याने दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या दिवसात पाणी उकळून पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो; मात्र जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरशिवाय पाणी पुरवठा होत असल्याचे जुलै महिन्याच्या अहवालातून समोर आले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाण्यातून होणाºया आजारांपासून संरक्षण मिळावे, तसेच ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याअनुषंगाने आरोग्य विभागातर्फे तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने वॉटर गार्ड पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोग शाळेमार्फत त्यांची तपासणी केली जाते.जुलै महिन्यात मिळालेल्या अहवालानुसार २८ ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न करता पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले.यामध्ये अकोला व बाळापूर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात होत असलेला दूषित पाणीपुरवठा ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक