शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

इव्हीएम असेपर्यंत लोकसभा निवडणूक जिंकणे अशक्य - प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 19:11 IST

अकोला : इव्हीएमचा खेळ काँगे्रसच्या काळापासून सुरू आहे. काँग्रेसने मशिनचा वापर उमेदवारांना पाडण्यासाठी केला तर आता भाजप उमेदवारांना निवडून ...

अकोला : इव्हीएमचा खेळ काँगे्रसच्या काळापासून सुरू आहे. काँग्रेसने मशिनचा वापर उमेदवारांना पाडण्यासाठी केला तर आता भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी करीत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीतही इव्हीएम मॅनेज केल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहावयास मिळाले. मतदान प्रक्रीयेत इव्हीएम असेपर्यंत आपण लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही, असेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा मेळावात सांगितले.पुढे बोलताना त्यांनी लुटारूंची टोळी असते तशी सत्ताधारांची टोळी आहे. सद्यस्थितीत मोदी आणि इतरांनी ठरवून चाललेला खेळ आहे. मनमोहन सिंग यांच्या काळातील लूट पद्धतशिरपणे होती तर भाजपचे सरकार भुरटे चोर असल्याचा टोलाही त्यांनी येथे लगावला. दोन्ही पक्षांच्या संघटीत टोळी सोबत वंचित बहुजन आघाडीला लढायचे आहे. मतदानात व मोजणीत फरक तसेच इव्हीएमसंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांचे पत्र आहे. मात्र, त्यावरही काहीच झाले नसल्याचेही ते म्हणाले. सत्ताधारी चोरांच्या विरोधात लढत आहोत. त्यामुळे भाजपसोबत जायचे ठरविले तरी ते घेणार नाहीत. कारण वंचित बहुजन आघाडीचे ध्येयधोरण कोणते आहे, याची चांगलीच जाणीव त्यांना असल्याने आपल्याला स्वीकारले जात नाही, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. हैद्राबादचे डॉक्टर जळीत प्रकरण वेगळे आहे, अनेक गैरप्रकारांची तक्रार तिने केली होती. त्यामुळे या देशात आमच्या विरोधात जाल तर जिवंत राहू शकत नाही, हा प्रकार देशात सुरू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, नागपूर जिल्हा परिषदांची निवडणूक स्वबळावर लढवू, त्यामध्ये मोठ्या संख्येने उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी