शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इंग्रजी, सेमी इंग्रजी सोडून दोन हजारावर विद्यार्थी मातृभाषेकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:25 IST

इंग्रजी विषयाचे वाढते आकर्षण आणि प्रस्थ वाढलेले असताना, विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये प्रवेश घेत आहेत.

- नितीन गव्हाळे

अकोला: गत वर्षभरामध्ये इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यम सोडून विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. वर्षभरामध्ये अकोला जिल्ह्यातील दोन हजार ८२१ विद्यार्थी मराठी माध्यमांमध्ये दाखल झाले आहेत. इंग्रजी विषयाचे वाढते आकर्षण आणि प्रस्थ वाढलेले असताना, विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये प्रवेश घेत आहेत. ही बाब सकारात्मक असून, विद्यार्थ्यांसह पालकांचा मराठीकडे कल वाढला पाहिजे, यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मराठी भाषेविषयी करण्यात येत असलेली जागरुकता, जिल्हा परिषद शाळांमधील वाढत असलेले गुण यामुळे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मराठी माध्यमांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढत आहे. लोकसहभागातून शाळा डिजिटल होत असून, भौतिकसुद्धा उपलब्ध होत आहेत. एवढेच नाही तर अनेक जिल्हा परिषद शाळांनी कॉन्व्हेंट शाळासुद्धा सुरू केल्या आहेत. त्यामुळे पालकांचा ओढा आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी मराठी माध्यमांच्या शाळांकडे वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांकडे कल वाढत आहे. विद्या प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये यंदा ९0 हजारावर विद्यार्थी इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमांकडे वळले आहेत. अकोला जिल्ह्यात ९५७ शाळांमध्ये दोन हजार ८७१ विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, पोषण आहार योजनांसोबतच शैक्षणिक उपक्रमसुद्धा राबविण्यात येत असल्यामुळे या शाळांमधील शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता उंचावत आहे. यंदा तर जिल्ह्यातील बोर्डी, दिग्रस, वाडेगाव आणि सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या शाळांना आता आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार असल्याने, या भागातील पालकांनी कॉन्व्हेंटमध्ये टाकलेल्या मुलांची नावे काढून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घातली आहेत.कॉन्व्हेंटच्या तुलनेत मराठी शाळाच बरी!शिक्षण तज्ज्ञांच्या मते, इंग्रजी माध्यमांमधील मुले पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये टिकत नाहीत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून मराठी माध्यमच हवे, याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये होणारी चर्चा आणि जिल्हा परिषद शाळांची वाढत असलेली गुणवत्ता लक्षात घेता, पालकांचा कल मराठी माध्यमांकडे वाढत आहे. हजारो रुपये डोनेशन भरून कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतल्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला तर खर्चही फार येत नाही. गणवेश, पाठ्यपुस्तके, पोषण आहारही मिळतो. त्यामुळे हजारो रुपये डोनेशन भरण्यापेक्षा आपली मराठी शाळाच बरी, अशी मानसिकता बदलत आहे.

  • जिल्ह्यातील एकूण शाळा- ९५७
  • मराठी माध्यमांकडे वळलेले मुले- २८७१
  • जि.प.च्या आंतरराष्ट्रीय शाळा- 0४

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी