शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी प्रयत्न करा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:38 PM

शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. त्यावर अद्याप कोणताही तोडगा काढता आला नाही, अशी खंत व्यक्त करताना यामागील सूक्ष्म कारण शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी अकोला येथे केले.

अकोला: जे काही बदल होत असतात, ते स्वीकारणे कठीण जात असतात, त्याला मानवी अहंकार आडवा येतो. म्हणूनच कुणाला जाणवू न देता असे काही बदल करावे लागतात. जलसंधारण आणि सिंचनाच्या बाबतीतही काही चांगले बदल करण्यात येत आहेत. ते बदल स्वीकारले पाहिजे. शेतकरी त्यादृष्टीने प्रयत्न करतोय; परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. त्यावर अद्याप कोणताही तोडगा काढता आला नाही, अशी खंत व्यक्त करताना यामागील सूक्ष्म कारण शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी अकोला येथे केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग, अकोलाच्यावतीने डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित दोन दिवसीय २० व्या राज्यस्तरीय महाराष्टÑ सिंचन परिषदेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. मंचावर आंतरराष्टÑीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे माजी सहकार्यवाह डॉ. माधवराव चितळे, महाराष्टÑ सिंचन सहयोग अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे औरंगाबाद, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, तापी खोरे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक संजय कुळकर्णी जळगाव, पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र जलतारे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अधीक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी, डॉ. बापू अडकिने, कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर,अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. एम.बी. नागदेवे यांची उपस्थिती होती.धोेत्रे पुढे म्हणाले, रासायनिक खते, कीटकनाशकांनी शेतीची पोत बदलली असून, यामुळे पाण्याचे जमिनीत जलसंधारण होत नाही. म्हणूनच आता जमिनीची सुपीकता वाढविण्यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. नलिका वितरण प्रणालीवर बोलताना ते म्हणाले, तात्पुरता फायदा बघण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांकडे बघणे गरजेचे आहे. कालव्याने पाणी सोडले तर शेतकºयांच्या विहिरीतील पातळी वाढते; परंतु पाइपने पाणी सोडले तर शेतकºयांच्या विहिरींना पाणी कसे येणार, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित होत आहे. म्हणूनच कोणतेही व्यवस्थापन करा; पण ते परिपूर्ण, योग्य असावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे