शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:36 IST

विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान ग्रहण करतात. त्या ज्ञानाची सांगड निसर्गातील घटनांशी घालून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव यांनी येथे केले. 

ठळक मुद्देविभागीय विज्ञान मेळावा मानसी राऊत, वैष्णवी गरड, श्रेया कंबोई चमकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान ग्रहण करतात. त्या ज्ञानाची सांगड निसर्गातील घटनांशी घालून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव यांनी येथे केले. राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती, शिक्षणाधिकारी माध्यमिक, बालशिवाजी शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात गुरुवारी उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अविनाश देव होते. अमरावतीचे विभागीय शास्त्र सल्लागार मुकुंद घडेकर, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरुण शेगोकार, विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागीय अध्यक्ष प्रा. रवींद्र भास्कर, बालशिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थित होती. अविनाश देव यांनी मार्गदर्शन करताना उत्तम विद्यार्थीच उत्तम शिक्षक बनू शकतो. शिक्षकानेसुद्धा विद्यार्थी बनूनच विविध ज्ञान ग्रहण करावे, तरच त्याच्या विद्यार्थ्यांची प्रगती होते, असे सांगितले. विभागीय मेळाव्यामध्ये बालशिवाजी शाळेची मानसी अरुण राऊत हिने प्रथम क्रमांक पटकावला. मोहनाबाई कन्या शाळा दिग्रस (यवतमाळ) येथील वैष्णवी सुभाष गरड, एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिमची श्रेया जयप्रकाश कंबोई यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे होते. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थिनींना बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. अर्चना सावरकर, प्रा. डॉ. पूनम अग्रवाल, प्रा. डॉ. सावरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र भास्कर यांनी केले. संचालन संगीता जळमकर यांनी केले. आभार अरुण शेगोकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष जाधव, अनिल जोशी, सुरेश किरतकर, विश्‍वास जढाळ, विनोद देवके, देवानंद मुसळे, सुनील वावगे, सुनील निखाडे, मनोज तायडे, माया देहानकर, सुरेखा माकोटे, विजय पजई, पी.एम. संगमवार आदींनी प्रयत्न केले.