शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
2
Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
3
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीचे दर नव्या उच्चांकावर; चांदी २.६५ लाखांच्या पार, सोन्यातही मोठी तेजी, पटापट चेक करा नवे दर
4
इस्रोला मोठा धक्का! PSLV-C62 मोहीमेत अडथळा; लष्करी सामर्थ्य, 'नाविक' प्रणालीसाठी गंभीर संकट
5
एवढा भाव वाढल्यावर चांदीत पैसा गुंतवावा का; चांदीची चमक वाढतेय... कारण काय?
6
"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
7
"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी
8
मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन
9
'इराणनंतर आता आमचा नंबर लावताय का?'; किम जोंग उनचा अमेरिकेवर हल्लाबोल! नेमकं काय झालं?
10
इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली?
11
IND vs NZ: एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच किंग; बलाढ्य संघांना जमलं नाही, ते करून दाखवलं!
12
BSNL चा धमाका: वर्षभरासाठी रिचार्जची कटकट संपली! 'या' प्लॅनमध्ये दररोज मिळतोय ३GB डेटा आणि बरंच काही
13
मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... 
14
मराठवाड्यात सत्तेचा सोहळा; २५८४ उमेदवारांकडून २४९ कोटींचा खर्च..!
15
८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?
16
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
17
Inflation Impact in India: २० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित
18
Makar Sankranti 2026: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?
19
अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम
20
संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:36 IST

विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान ग्रहण करतात. त्या ज्ञानाची सांगड निसर्गातील घटनांशी घालून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव यांनी येथे केले. 

ठळक मुद्देविभागीय विज्ञान मेळावा मानसी राऊत, वैष्णवी गरड, श्रेया कंबोई चमकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान ग्रहण करतात. त्या ज्ञानाची सांगड निसर्गातील घटनांशी घालून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव यांनी येथे केले. राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती, शिक्षणाधिकारी माध्यमिक, बालशिवाजी शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात गुरुवारी उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अविनाश देव होते. अमरावतीचे विभागीय शास्त्र सल्लागार मुकुंद घडेकर, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरुण शेगोकार, विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागीय अध्यक्ष प्रा. रवींद्र भास्कर, बालशिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थित होती. अविनाश देव यांनी मार्गदर्शन करताना उत्तम विद्यार्थीच उत्तम शिक्षक बनू शकतो. शिक्षकानेसुद्धा विद्यार्थी बनूनच विविध ज्ञान ग्रहण करावे, तरच त्याच्या विद्यार्थ्यांची प्रगती होते, असे सांगितले. विभागीय मेळाव्यामध्ये बालशिवाजी शाळेची मानसी अरुण राऊत हिने प्रथम क्रमांक पटकावला. मोहनाबाई कन्या शाळा दिग्रस (यवतमाळ) येथील वैष्णवी सुभाष गरड, एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिमची श्रेया जयप्रकाश कंबोई यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे होते. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थिनींना बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. अर्चना सावरकर, प्रा. डॉ. पूनम अग्रवाल, प्रा. डॉ. सावरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र भास्कर यांनी केले. संचालन संगीता जळमकर यांनी केले. आभार अरुण शेगोकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष जाधव, अनिल जोशी, सुरेश किरतकर, विश्‍वास जढाळ, विनोद देवके, देवानंद मुसळे, सुनील वावगे, सुनील निखाडे, मनोज तायडे, माया देहानकर, सुरेखा माकोटे, विजय पजई, पी.एम. संगमवार आदींनी प्रयत्न केले.