शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 11:13 AM

विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : बाळापूर नगरपालिकेकडे मलनिस्सारण यंत्र नसल्याने शौचालयांचे टाके खाली करण्यासाठी मजुरांकडून मानवी विष्ठा डोक्यावरून वाहून न्यावी लागत आहे. ही विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बाळापूर नगर परिषदेने २00२ मध्ये ट्रॅक्टर सोबतच व्हॅक्युम एमटीआर मलनिस्सारण यंत्र आणले; परंतु त्याचा एकदाही उपयोग न झाल्याने लाखो रुपयांचे महत्त्वाचे उपकरण वापरात नाही. त्यामुळे, शहरातील शौचालयांचे टाके उपसण्यासाठी मजुरांना जुंपून टोपल्याद्वारे मानवी विष्ठेची वाहतूक करावी लागत आहे. ही विष्ठा नदी काठावर फेकण्यात येत असल्याने परिसर व नदीचे प्रदूषण होत आहे. शासन एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून परिसर स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करते; मात्र नगर परिषद प्रशासन शहरातील सर्व घनकचरा नदीकाठावरच टाकत असल्याचे चित्र आहे. या कचऱ्यावरच मानवी विष्ठा फेकण्यात येत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देऊन घरोघरी शौचालयांची निर्मिती केली आहे. सेफ्टिक शौचालयांचे टाके लवकरच भरत आहेत. हे टाके खाली करण्यासाठी नगर परिषदेकडे हॅक्युम एमटीआर मलनिस्सारण यंत्र नसल्याने मजुरांच्या माध्यमातून ते खाली करण्यात येतात. हे टाके खाली करण्यासाठी मजूर हातगाडी किंवा जवळ असल्यास डोक्यावर टोपल्यात भरून त्याची वाहतूक करीत आहेत. ही विष्ठा नदीच्या काठावरच टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  ५५ हजार लोकसंख्येच्या शहरात व्हॅॅक्युम एमटीआर यंत्र नसल्याने नदी काठावर मानवी विष्ठा टाकण्याचे काम माणसाकडून करून घेणे हा गुन्हा आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन प्रदूषण करीत असलेल्या नगरपालिकेवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच मानवी विष्ठा डोक्यावरून वाहून नेणे चुकीचे आहे. यावर कडक कारवाई व्हावी.- रमेश लोहकरे,जिल्हा भाजपा सचिव,बाळापूर

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेचे व्हॅक्युम एमटीआर यंत्र नादुरुस्त आहे. त्याचा वापर नसल्याने खराब झाले. शहरातील टाके साफ करण्यासाठी बाहेरून ट्रॅक्टरचे व्हॅक्युम एमटीआर बोलविण्यासाठी नागरिकांना सूचना केल्या. नवीन व्हॅक्युम एमटीआर यंत्र बोलविण्यासाठी सभागृहात चर्चा करून नवीन यंत्र घेण्याची तरतूद करू. नागरिकांनी टाके साफ करण्यासाठी मानवाऐवजी यंत्राचा वापर करावा.- जी.एस. पवार,न.प. मुख्याधिकारी, बाळापूर

टॅग्स :BalapurबाळापूरAkolaअकोला