शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अजूनही वेळ गेलेली नाही, पण...; काँग्रेसची 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांना साद

By नितिन गव्हाळे | Updated: April 4, 2024 19:59 IST

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले आहे.

अकोला : देशाचे संविधान, लोकशाही महत्त्वाची आहे. मत विभाजन व्हायला नको. वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी राहावी यासाठी काँग्रेसने शेवटपर्यंत प्रयत्न केले. अकोल्याचा उमेदवार शेवटपर्यंत जाहीर केला नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र, त्यांचे उमेदवार जाहीर केले. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. पण, तुमच्या मनात शंका आहे, असे टीकास्त्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांवर सोडले आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले नाना पटोले हे ४ एप्रिल रोजी दुपारी अकोल्यात स्वराज्य भवन प्रांगणात आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार धीरज लिंगाडे, आमदार अमित झनक, उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या विरोधात उमेदवार उभे केले. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी उद्धवसेनेसोबत आघाडी केली होती. आमच्याकडे त्यांच्या वाटाघाटी नसतानाही प्रदेशाध्यक्ष म्हणून सकारात्मक भूमिका घेतली. दिल्लीत भूमिका मांडून वरिष्ठ नेत्यांना समजावून सांगितले. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला. पण ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कधीही भेटले नाहीत, असेही सांगितले. आंबेडकरांनी भाजपमध्ये माझे मित्र आहेत, असा आरोप केल्याचे सांगून, पटोले म्हणाले की, मैत्री आहे, पण विचारांची मैत्री आहे. असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोलाNana Patoleनाना पटोले