शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:32 PM

विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

संतोष येलकर,अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अन्नधान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यासाठी राज्यात शासनाच्या पुरवठा विभागामार्फत १५ जुलै ते १४ आॅगस्ट या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे. विशेष मोहिमेच्या पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांकडून अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यासाठी २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना लवकरच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यात येणार आहे.७२०८ अर्जांची पडताळणी पूर्ण!अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थींकडून प्राप्त झालेल्या २७ हजार ४२७ अर्जांची पडताळणी जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांपैकी २ आॅगस्टपर्यंत ७ हजार २०८ अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत वंचित लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न-धान्याचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ आॅगस्टपर्यंत लाभार्थ्यांकडून २७ हजार ४२७ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पडताळणीनंतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न -धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.-बी.यू.काळेजिल्हा पुरवठा अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना