शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आठवीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तिसरी, पाचवीतील विद्यार्थी सरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:12 IST

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात अकोला जिल्हय़ातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी वाखणण्यासारखी नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे१७३ शाळांमध्ये अचिव्हमेंट सर्वेक्षण राज्यातून जिल्हा ३0 व्या स्थानावर

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात अकोला जिल्हय़ातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी वाखणण्यासारखी नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हय़ातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे. त्यांचे कोणत्या विषयामध्ये किती ज्ञान आहे. हे तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने अकोला जिल्हय़ातील १७३ शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले. इयत्ता तिसरी व पाचवीच्या प्रत्येकी ६१ आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (इव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास,  मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. यात इयत्ता तिसरी, पाचवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कौतुकास्पद नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून आले. परंतु जिल्हय़ातील इयत्ता आठवीतील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत बरेच माघारले असल्याचे दिसून आले. त्यामुळे आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे या सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या टक्केवारीतून दिसून येत आहे. 

केंद्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्या प्राधिकरणांतर्गत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हय़ातील १७३ शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांंचे सर्वेक्षण घेतले. या सर्वेक्षणात तिसरी, पाचवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक आहे.  आठवीतील विद्यार्थ्यांंची गुणवत्ता खालावलेली असून, ही गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. - सागर तुपे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिकSchoolशाळाStudentविद्यार्थी