शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

आठवीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तिसरी, पाचवीतील विद्यार्थी सरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:12 IST

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात अकोला जिल्हय़ातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी वाखणण्यासारखी नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे१७३ शाळांमध्ये अचिव्हमेंट सर्वेक्षण राज्यातून जिल्हा ३0 व्या स्थानावर

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात अकोला जिल्हय़ातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी वाखणण्यासारखी नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हय़ातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे. त्यांचे कोणत्या विषयामध्ये किती ज्ञान आहे. हे तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने अकोला जिल्हय़ातील १७३ शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले. इयत्ता तिसरी व पाचवीच्या प्रत्येकी ६१ आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (इव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास,  मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. यात इयत्ता तिसरी, पाचवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कौतुकास्पद नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून आले. परंतु जिल्हय़ातील इयत्ता आठवीतील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत बरेच माघारले असल्याचे दिसून आले. त्यामुळे आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे या सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या टक्केवारीतून दिसून येत आहे. 

केंद्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्या प्राधिकरणांतर्गत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हय़ातील १७३ शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांंचे सर्वेक्षण घेतले. या सर्वेक्षणात तिसरी, पाचवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक आहे.  आठवीतील विद्यार्थ्यांंची गुणवत्ता खालावलेली असून, ही गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. - सागर तुपे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिकSchoolशाळाStudentविद्यार्थी