शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:22 IST

शिक्षण विभागाने मूल्यांकनाबाबत ठोस सूचना न दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले आहेत; परंतु शिक्षण विभागाने मूल्यांकनाबाबत ठोस सूचना न दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात आहेत. निकाल लावावा तरी कसा? आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश कसा द्यावा, असे प्रश्न शिक्षकांसमोर उभे झाले आहेत.दरवर्षी १ मे रोजी किंवा ५ मेपर्यंत शाळांचे निकाल जाहीर होतात. परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्यात येतो; परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्गात विद्यार्थ्यांना कसा प्रवेश द्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने कोणत्याही मार्गदर्शक सूचना न देता, केवळ विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेऊन मूल्यांकन करावे आणि पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्या आधारे मूल्यांकन करावे, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरसिंग घेतली होती; परंतु त्यातही मूल्यांकनाविषयी स्पष्ट करण्यात आले नाही. मूल्यांकनाचे स्वरूप कसे असणार, याची जबाबदारी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेकडे दिली आहे.अद्यापपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेने मूल्यांकनाच्या स्वरूपाबद्दल कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांमधील संभ्रम कायम आहे. अनेक खासगी शाळांमध्ये शिकणाºया मुलांचे तीन ते सहा महिन्यांचे थकीत शुल्क आहे. संचारबंदीमुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शैक्षणिक शुल्क भरल्याशिवाय पुढील वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, अशा सूचना शाळांकडून पालकांना दिल्या आहेत. त्यामुळे पालकांसमोरही पेच निर्माण झाला आहे.इयत्ता पहिली ते नववीच्या निकालाबाबत व्हिडिओ कॉन्फरसिंग झाली आहे. शिक्षकांनी प्रथम सत्रामध्ये झालेल्या संकलित चाचणी आणि द्वितीय सत्रातील आकारित मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करावा. निकाल कधी जाहीर करावा, याबाबत लवकरच सूचना देण्यात येतील.-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारीप्राथमिक विभाग.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकEducationशिक्षणStudentविद्यार्थी