शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विषमुक्त फळे, भाजीपाला उत्पादनाचा घेतला ध्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 2:19 PM

सेंद्रीय शेती उत्पादनाचा त्याचा हा प्रकल्प इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विषमुक्त अन्न, भाजीपाला उत्पादनासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु महिला शेतकरी वंदना धोत्रे गत ९ वर्षापासून प्रत्यक्ष सेंद्रिय फळे, भाजीपाला उत्पादन घेत असून, अकोलेकरांना हा भाजीपाला उपलब्धही करू न देत आहेत. सेंद्रीय शेती उत्पादनाचा त्याचा हा प्रकल्प इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.पातूर तालुक्यातील विवराच्या महिला शेतकरी वंदना धोत्रे यांच्याकडे ४ एकर शेती आहे.हेच त्यांच्या उपजिवीकेचे साधन आहे.रासायनिक शेतीचा धोका वाढल्याने यावर उपाय म्हणून त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा ध्यास घेतला. याकरिता त्यांनी सुरुवातीला सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला.यातूनच त्यांनी २०११ पासून बायोडायनामिक सेंद्रिय शेती करण्यात सुरुवात केली. २०१४ पासून त्या प्रमाणित सेंद्रिय शेती करीत आहेत. अर्थात यासाठी त्यांना त्यांचे पती देवीदास धोत्रे यांची मोठी साथ आहे. सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासह त्या बुनियाद केंद्र चालवतात. तद्वतच बायोडायनामिक सेंद्रिय शेती कशी करावी, यासाठीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करीत आहेत.चार एकरावर सेंद्रिय शेती करणे याला धाडसच हवे; परंतु त्या ज्या पद्धतीने सेंद्रिय शेती करतात हा एक आदर्शच आहे. त्यांच्या शेतात सर्व प्रकारच्या भाज्या तसेच फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या शेतात निर्मित भाजीपाला आठवड्यातील तीन दिवस अकोल्यातील गोरक्षण रोडवर विक ण्यात येतो. सुरुवातीला यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले. आजमितीस त्या दररोज १ हजार रुपये निव्वळ नफा मिळवित असून, शेती उत्पादनावरच त्यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा सेंद्रिय शेती करण्याचा लौकिक सर्वत्र पसरला असून, सेंद्रिय शेती बघण्यासाठी केंद्रीय सहसचिव राणी कुमोदिनी, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी भेट दिली. आतापर्यंत ३ हजारांवर शेतकरी शेती बघून गेले. अकोला कृषी विज्ञान केंद्राने त्यांचा गौरव केला आहे. यासाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

नागरिकांना विषमुक्त फळे, भाजीपाला नियमित मिळावीत म्हणून माझे पती आणि मी सेंद्रिय शेती करीत आहे. आम्ही दोघे प्रमाणित सेंद्रिय भाजीपाला व फळे विक्री करतोय.-वंदना धोत्रे,विवरा.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी