शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:11 IST

पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्ज वाटपाच्या नियोजनात शेतकरी कर्जमाफीसाठी माहिती अपलोड झालेले १,०९,६४५ व गतवर्षी कर्ज वाटप केलेल्या ५५,६९१ शेतकरी मिळून चालू वर्षात १ लाख ५० हजार खातेधारकांना चालू वर्षात कर्ज वाटप करण्याची तयारी आहे. त्याचवेळी १ एप्रिलपासून वाटप सुरू करणे अपेक्षित असताना इतक्या दिवसांत आतापर्यंत केवळ ८ हजार म्हणजेच ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पेरणीला केवळ ३० ते ४० दिवसांचा कालावधी उरल्याने उर्वरित शेतकºयांना पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे.गत काही वर्षांत पीक कर्ज भरण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकºयांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्या योजनेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २२७ बँकांमध्ये असलेल्या १,८४,०२० शेतकरी खातेदारांपैकी ६९,८५९ शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ४३९ कोटी रक्कम शासनाकडून जमा झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पात्र १,६५,३३६ पैकी केवळ १ लाख ५० हजार शेतकºयांनाच १,२०० कोटी रुपये पीक कर्ज देण्याचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे. त्यामध्ये १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना खरीप तर ७,५०० शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज वाटप होणार आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप १ एप्रिलपासून सुरू होणे अपेक्षित आहे; मात्र चालू वर्षात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संचारबंदी, लॉकडाउनच्या काळात अनेक सेवा विस्कळीत झाल्या.त्यामध्ये बँकांच्या कामकाजालाही फटका बसला. ही परिस्थिती असली तरी खरिपाची पेरणी तोंडावर येत आहे. पीक कर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यास आधीच उशीर झाला. त्यातही लॉकडाउनचे नियम पाळत वाटप करावे लागत आहे.या सर्व अडथळ्यांमुळे कर्ज वाटपाची गती मंदावली. आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृ त बँका मिळून केवळ ८ हजार शेतकºयांना वाटप झाले आहे. त्यातही सहा हजार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार आहेत. राष्ट्रीयीकृ त बँकांनी केवळ दोन हजार शेतकºयांना वाटप केले. ही परिस्थिती पाहता पेरणीला सुरुवात होईपर्यंत किती शेतकºयांच्या हातात कर्जाची रक्कम मिळेल, ही बाब सध्यातरी अनिश्चित आहे. ं

७४ हजार शेतकºयांचा वांधाकर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अद्याप ७४,३५५ शेतकºयांची माहिती अपलोड झालेली नाही. त्यामुळे चालू वर्षात ते शेतकरी कर्ज वाटपासाठी पात्र ठरतात की नाही, याबाबतचा संभ्रमही आता शेतकºयांमध्ये आहे. या शेतकºयांबाबत निर्णय न झाल्यास त्यांना गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.नियोजनाप्रमाणे शेतकºयांना कर्ज वाटप सुरू आहे. पेरणीच्या काळापूर्वी वाटपाची गती वाढविण्याचे बँकांना सांगितले आहे. त्यानुसार सर्वांना कर्ज वाटप होणार आहे.- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी