शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:11 IST

पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्ज वाटपाच्या नियोजनात शेतकरी कर्जमाफीसाठी माहिती अपलोड झालेले १,०९,६४५ व गतवर्षी कर्ज वाटप केलेल्या ५५,६९१ शेतकरी मिळून चालू वर्षात १ लाख ५० हजार खातेधारकांना चालू वर्षात कर्ज वाटप करण्याची तयारी आहे. त्याचवेळी १ एप्रिलपासून वाटप सुरू करणे अपेक्षित असताना इतक्या दिवसांत आतापर्यंत केवळ ८ हजार म्हणजेच ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पेरणीला केवळ ३० ते ४० दिवसांचा कालावधी उरल्याने उर्वरित शेतकºयांना पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे.गत काही वर्षांत पीक कर्ज भरण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकºयांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्या योजनेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २२७ बँकांमध्ये असलेल्या १,८४,०२० शेतकरी खातेदारांपैकी ६९,८५९ शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ४३९ कोटी रक्कम शासनाकडून जमा झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पात्र १,६५,३३६ पैकी केवळ १ लाख ५० हजार शेतकºयांनाच १,२०० कोटी रुपये पीक कर्ज देण्याचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे. त्यामध्ये १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना खरीप तर ७,५०० शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज वाटप होणार आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप १ एप्रिलपासून सुरू होणे अपेक्षित आहे; मात्र चालू वर्षात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संचारबंदी, लॉकडाउनच्या काळात अनेक सेवा विस्कळीत झाल्या.त्यामध्ये बँकांच्या कामकाजालाही फटका बसला. ही परिस्थिती असली तरी खरिपाची पेरणी तोंडावर येत आहे. पीक कर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यास आधीच उशीर झाला. त्यातही लॉकडाउनचे नियम पाळत वाटप करावे लागत आहे.या सर्व अडथळ्यांमुळे कर्ज वाटपाची गती मंदावली. आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृ त बँका मिळून केवळ ८ हजार शेतकºयांना वाटप झाले आहे. त्यातही सहा हजार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार आहेत. राष्ट्रीयीकृ त बँकांनी केवळ दोन हजार शेतकºयांना वाटप केले. ही परिस्थिती पाहता पेरणीला सुरुवात होईपर्यंत किती शेतकºयांच्या हातात कर्जाची रक्कम मिळेल, ही बाब सध्यातरी अनिश्चित आहे. ं

७४ हजार शेतकºयांचा वांधाकर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अद्याप ७४,३५५ शेतकºयांची माहिती अपलोड झालेली नाही. त्यामुळे चालू वर्षात ते शेतकरी कर्ज वाटपासाठी पात्र ठरतात की नाही, याबाबतचा संभ्रमही आता शेतकºयांमध्ये आहे. या शेतकºयांबाबत निर्णय न झाल्यास त्यांना गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.नियोजनाप्रमाणे शेतकºयांना कर्ज वाटप सुरू आहे. पेरणीच्या काळापूर्वी वाटपाची गती वाढविण्याचे बँकांना सांगितले आहे. त्यानुसार सर्वांना कर्ज वाटप होणार आहे.- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी