शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 10:39 IST

The school bell will ring : १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अकाेला : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्यापही विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही. १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु याकरिता ग्रामपंचायत व पालकांच्या ‘ना हरकत’ची गरज आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी वर्ग आनंदात आहे.

कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य देण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र मिळाल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापकांचा समावेश असलेल्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.

 

जिल्ह्यातील एकूण शाळा १८६८

शासकीय ९१२

अनुदानित ६७४

विनाअनुदानित २८२

जिल्ह्यातील एकूण गावे ९९८

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे ९२०

 

तालुकानिहाय गावे

अकोला १९७

अकोट १८१

मूर्तिजापूर १६४

बार्शीटाकळी १५९

पातूर ९६

बाळापूर ९९

तेल्हारा १०२

आतापर्यंत १ ग्रामपंचायतचा ठराव

काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत अकाेला तालुक्यातील कापशी ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. साेमवार, १२ जुलै रोजी शाळा सुरू हाेणारे कापशी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे.

 

पालकांचीही हा...

मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे, तर घरच्या घरी राहून मुलांचीसुद्धा चिडचिड वाढली आहे. शाळा सुरू झाल्यास आम्ही पाल्यांना शाळेत पाठवू; परंतु शाळेने योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

- सुनीता जटाळ, पालक

 

जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून, सर्व व्यवहारही सुरळीत सुरू आहेत. अशा वेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मुलेही घरच्या घरी राहून त्रस्त झाली आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवू.

- रवी मोहोड, पालक

शिक्षणाधिकारी म्हणतात...

शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये कोरोनामुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यासाठी सर्व पालक, शिक्षकांकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. सर्वेक्षणात आपले मत नोंदवावे.

- डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

पहिली ते आठवीचे तालुकानिहाय विद्यार्थी

अकोला पं.स.- ९१६७४

अकोट- ३४४५५

बाळापूर- २५५२४

बार्शीटाकळी- १७०११

मूर्तिजापूर- २००६३

पातूर- १७१६५

तेल्हारा- २१८४२

मनपा क्षेत्र- ७४७९

एकूण- २३५२१३

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा