शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

जलपरिपूर्णता अहवाल ठरवणार टंचाईग्रस्त गावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:52 IST

अकोला : गावाची पाण्याची गरज आणि जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे उपलब्ध झालेले पाणी, याचा ताळेबंद बरोबर येत असल्यास ती गावे ‘जलपरिपूर्ण’ ठरवली जाणार आहेत. अभियानातून ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ निर्मितीचे शासकीय धोरण आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील गावांचा अहवाल अद्यापही तयार नाही!

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गावाची पाण्याची गरज आणि जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे उपलब्ध झालेले पाणी, याचा ताळेबंद बरोबर येत असल्यास ती गावे ‘जलपरिपूर्ण’ ठरवली जाणार आहेत. अभियानातून ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ निर्मितीचे शासकीय धोरण आहे. त्याचवेळी जलयुक्तची कामे झालेल्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या असल्यास ती गावे टंचाईग्रस्त घोषित कशी करणार, हा मुद्दा आता शासनाची गोची करणारा ठरू शकतो. जिल्ह्यातील  शेकडो गावांचा जलपरिपूर्णतेचा अहवालच तयार नसल्याचीही माहिती आहे.राज्यातील पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने शासनाने डिसेंबर २0१४ पासून जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम सुरू केला. गावपातळीवर अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी शिवारफेरी काढून गाव आराखडा तयार केला. त्या आराखड्यातील २0१५-१६ मध्ये निवड केलेली कामे पूर्ण झाली आहेत. त्या पूर्ण झालेल्या कामांतून गावाला पाण्याचा किती फायदा झाला, याचा ताळेबंद आता शासनाने मागवला आहे. मात्र, त्या अहवालासंदर्भात कुठलीही माहिती कृषी आणि महसूल विभागाकडे नाही. गावे जलपरिपूर्ण करण्याची कार्यपद्धतीही निश्‍चित करण्यात आली. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाचे मुख्य अभियंता यांच्या समितीने दिलेल्या तांत्रिक मुद्यांनुसार तो अहवाल तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे, त्याबाबत अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, नेहमीप्रमाणे ते ‘नॉट ऑन्सरिंग’ मोडवर होते. 

३00 पैकी किती गावे टंचाईमुक्त?जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २0१५-१६ मध्ये ३00 गावांची निवड करून कामे करण्यात आली. त्या गावांतील कामे पूर्ण झाली आहेत. त्यातून किती गावे जलपरिपूर्ण झाली, याचा अहवाल आता शासकीय यंत्रणांना द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे, अभियानातून टंचाईमुक्त झालेल्या गावांमध्ये पाणीटंचाई असल्यास त्या गावांना टंचाईग्रस्त म्हणून निधी कसा देणार, यावर आता शासनाची भूमिका काय असेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

पाणी साठय़ाचा तपशीलही द्यावा लागणार!भाग तीनमध्ये गावाला आवश्यक वार्षिक पाण्याची गरज, पावसाच्या नोंदीआधारे गावात पडणार्‍या पावसातून उतारामुळे मिळणारे पाणी, उपलब्ध पाणी अडवण्यासाठी घेतलेल्या कामांचा संपूर्ण तपशील घेतला जाणार आहे.

कामांमुळे पाणी साठय़ातील बदलाच्याही नोंदीजलयुक्त शिवार अभियानातील कामे केल्याने भूजल पातळी, पीक पद्धती, लागवडीखालील वाढलेले क्षेत्र, यामध्ये कोणता बदल झाला, त्यातील फरकाची नोंद होणार आहे. त्यानंतरच गावाचा जलपरिपूर्णता अहवाल अंतिम होईल. तो अहवाल ग्रामसभेत जाहीर केल्यानंतर ते गाव टंचाईमुक्त असल्याचे निश्‍चित होणार आहे. 

चार भागात होणार अहवालजलपरिपूर्णता अहवाल तयार करण्यासाठी चार भागात माहिती गोळा केली जाणार आहे. त्यामध्ये पहिल्या भागात अभियानात निवड होण्यापूर्वी आराखड्यानुसार गावाची भौगोलिक माहिती, लोकसंख्या, जनावरे, एकूण क्षेत्र, पीक परिस्थिती, लागवडीखालील क्षेत्र पीक आणि हंगामनिहाय, अस्तित्वातील विंधन विहिरी, सरासरी पाणी पातळी, गावातील भौतिक सुविधा याची नोंद केली जाणार आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAkola Ruralअकोला ग्रामीण