शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

पातूर तालुक्यातील दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवनाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 14:04 IST

अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे.

ठळक मुद्देशासनाने जिल्हा परिषदेकडे असलेल्या बंद पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी केली.प्रादेशिक योजनेवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे.

अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे. शासनाच्या अटीनुसार ठरावच न आल्याने योजनांचे पुनरुज्जीवन अशक्य होण्याची चिन्हे आहेत.गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतून नियमितपणे पाणी मिळण्याची सोय होऊ शकते. त्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेकडे असलेल्या बंद पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी केली. त्यासाठी प्रादेशिक योजनेवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. ग्रामपंचायतींनी चार अटींसह प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, गटविकास अधिकारी, संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी फेब्रुवारी अखेरपर्यंत ग्रामपंचायतींचे ठराव सादर करण्याचे बजावण्यात आले; मात्र आता मार्च अखेर आहे, तरीही प्रस्ताव प्राप्तच झाले नाही. तीन ते चार ग्रामपंचायतींना पाठविलेले प्रस्ताव मोघम आहेत. त्यामुळे या दोन योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी आहे, आधीची यंत्रणा आहे, तरीही अंदाजपत्रक तयार करणे पाणी पुरवठा विभागाला अशक्य झाले आहे. ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी या दोन्ही योजनांचे पुनरुज्जीवन करण्यास शासन तयार असताना ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.

 शासनाच्या अटींनुसारच हवा ठरावदेऊळगाव-पास्टुल १६ गावे, आलेगाव-नवेगाव १४ गावांना पाणी पुरवठ्याची सोय करण्यासाठी शासनाच्या अटीनुसार ग्रामपंचायतींना ठराव देणे बंधनकारक आहे. त्या अटीनुसार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करून गावामध्ये पुरवठा सुरू करावा का, योजनेतून गावे वर्षभर पाणी घेतील का, ग्रामस्थांकडून पाणीपट्टीचा भरणा नियमितपणे केला जाईल का, गावांतर्गत पाणी पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींची तयारी आहे का, या मुद्यांचा स्पष्ट ठराव घेऊन तो पाणी पुरवठा विभागाला सादर करावा लागणार आहे.

पंचायत समितीच्या आमसभेत गाजणार विषय!पंचायत समितीची आमसभा उद्या पातूर येथे आयोजित आहे. या सभेत संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायतींकडून ठराव मागविण्यासाठीची यापूर्वीची बैठक आमदार सिरस्कार यांनी घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार हा विषय गाजण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरWaterपाणी