शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

पातूर तालुक्यातील दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवनाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 14:04 IST

अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे.

ठळक मुद्देशासनाने जिल्हा परिषदेकडे असलेल्या बंद पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी केली.प्रादेशिक योजनेवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे.

अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे. शासनाच्या अटीनुसार ठरावच न आल्याने योजनांचे पुनरुज्जीवन अशक्य होण्याची चिन्हे आहेत.गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतून नियमितपणे पाणी मिळण्याची सोय होऊ शकते. त्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेकडे असलेल्या बंद पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी केली. त्यासाठी प्रादेशिक योजनेवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. ग्रामपंचायतींनी चार अटींसह प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, गटविकास अधिकारी, संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी फेब्रुवारी अखेरपर्यंत ग्रामपंचायतींचे ठराव सादर करण्याचे बजावण्यात आले; मात्र आता मार्च अखेर आहे, तरीही प्रस्ताव प्राप्तच झाले नाही. तीन ते चार ग्रामपंचायतींना पाठविलेले प्रस्ताव मोघम आहेत. त्यामुळे या दोन योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी आहे, आधीची यंत्रणा आहे, तरीही अंदाजपत्रक तयार करणे पाणी पुरवठा विभागाला अशक्य झाले आहे. ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी या दोन्ही योजनांचे पुनरुज्जीवन करण्यास शासन तयार असताना ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.

 शासनाच्या अटींनुसारच हवा ठरावदेऊळगाव-पास्टुल १६ गावे, आलेगाव-नवेगाव १४ गावांना पाणी पुरवठ्याची सोय करण्यासाठी शासनाच्या अटीनुसार ग्रामपंचायतींना ठराव देणे बंधनकारक आहे. त्या अटीनुसार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करून गावामध्ये पुरवठा सुरू करावा का, योजनेतून गावे वर्षभर पाणी घेतील का, ग्रामस्थांकडून पाणीपट्टीचा भरणा नियमितपणे केला जाईल का, गावांतर्गत पाणी पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींची तयारी आहे का, या मुद्यांचा स्पष्ट ठराव घेऊन तो पाणी पुरवठा विभागाला सादर करावा लागणार आहे.

पंचायत समितीच्या आमसभेत गाजणार विषय!पंचायत समितीची आमसभा उद्या पातूर येथे आयोजित आहे. या सभेत संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायतींकडून ठराव मागविण्यासाठीची यापूर्वीची बैठक आमदार सिरस्कार यांनी घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार हा विषय गाजण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरWaterपाणी