शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पातूर तालुक्यातील दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवनाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 14:04 IST

अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे.

ठळक मुद्देशासनाने जिल्हा परिषदेकडे असलेल्या बंद पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी केली.प्रादेशिक योजनेवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे.

अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे. शासनाच्या अटीनुसार ठरावच न आल्याने योजनांचे पुनरुज्जीवन अशक्य होण्याची चिन्हे आहेत.गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतून नियमितपणे पाणी मिळण्याची सोय होऊ शकते. त्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेकडे असलेल्या बंद पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी केली. त्यासाठी प्रादेशिक योजनेवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. ग्रामपंचायतींनी चार अटींसह प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, गटविकास अधिकारी, संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी फेब्रुवारी अखेरपर्यंत ग्रामपंचायतींचे ठराव सादर करण्याचे बजावण्यात आले; मात्र आता मार्च अखेर आहे, तरीही प्रस्ताव प्राप्तच झाले नाही. तीन ते चार ग्रामपंचायतींना पाठविलेले प्रस्ताव मोघम आहेत. त्यामुळे या दोन योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी आहे, आधीची यंत्रणा आहे, तरीही अंदाजपत्रक तयार करणे पाणी पुरवठा विभागाला अशक्य झाले आहे. ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी या दोन्ही योजनांचे पुनरुज्जीवन करण्यास शासन तयार असताना ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.

 शासनाच्या अटींनुसारच हवा ठरावदेऊळगाव-पास्टुल १६ गावे, आलेगाव-नवेगाव १४ गावांना पाणी पुरवठ्याची सोय करण्यासाठी शासनाच्या अटीनुसार ग्रामपंचायतींना ठराव देणे बंधनकारक आहे. त्या अटीनुसार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करून गावामध्ये पुरवठा सुरू करावा का, योजनेतून गावे वर्षभर पाणी घेतील का, ग्रामस्थांकडून पाणीपट्टीचा भरणा नियमितपणे केला जाईल का, गावांतर्गत पाणी पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींची तयारी आहे का, या मुद्यांचा स्पष्ट ठराव घेऊन तो पाणी पुरवठा विभागाला सादर करावा लागणार आहे.

पंचायत समितीच्या आमसभेत गाजणार विषय!पंचायत समितीची आमसभा उद्या पातूर येथे आयोजित आहे. या सभेत संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायतींकडून ठराव मागविण्यासाठीची यापूर्वीची बैठक आमदार सिरस्कार यांनी घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार हा विषय गाजण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरWaterपाणी