शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बाटलीबंद ज्युस व शीतपेयांमधील घटकांचे प्रमाण ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 6:38 PM

शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार.

अकोला: शीतपेय तयार करताना त्यात विविध घटकांचे प्रमाण किती असावे, या संदर्भात आतापर्यंत कुठलाच नियम नव्हता; परंतु यापुढे शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एफएसएसएआयच्या नवीन नियमावलीचे उल्लंघन केल्यास उत्पादकांवर कठोर कारवाईबाजारपेठेत विक्री होणाºया कुठल्याच शरबत, फळांचा रस तसेच इतर शीतपेयांमध्ये वापरण्यात येणाºया घटकांबद्दल आणि त्यांच्या प्रमाणाबद्दल कुठलेच नियम नव्हते. त्यामुळे उत्पादकांवर कुठलेच निर्बंधही नव्हते; परंतु आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पुढाकार घेत शीतपेय आणि ज्युस यामध्ये फळांचा रस आणि इतर घटकांचे प्रमाण किती असावे, याची नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, एफएसएसएआयच्या नवीन नियमानुसार फळांचा रस, पाणी, सॉलिड, सायट्रिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण ठरवण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने फळांचा रस आणि अन्य घटक किती असावेत, याचे प्रमाण ठरवून दिले आहे. या संदर्भात प्राधिकरणाकडून नोटिफिकेशनदेखील काढण्यात आले आहे. त्यानुसार, तज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. या सूचनांचा विचार करून अंतिम मसुदा तयार केला जाणार आहे. त्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.असे असेल प्रमाणशीतपेयांमध्ये फळांच्या रसासोबतच सायट्रिक अ‍ॅसिड व इतर घटकांचा समावेश असतो. एफएसएसएआयच्या नवीन नियमानुसार, शीतपेयांमध्ये फळांच्या रसाचे प्रमाण २५ टक्के, तर सायट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाण ३.५ टक्के असणे आवश्यक आहे. या शिवाय, इतर घटकांचे प्रमाण हे शीतपेयानुसार बदलण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने फळांचा रस आणि सायट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाण सारखेच ठेवण्यात आले आहे.

या निर्णयामुळे आता शीतपेय तयार करताना उत्पादकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. उत्पादकांनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) द्वारे कारवाई केली जाईल.- नितीन ताथोड, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य