शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
7
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
8
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
10
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
11
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
12
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
13
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
14
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
15
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
16
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
17
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
18
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
19
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
20
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा फटका; ज्वारीला फुटले कोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 14:08 IST

ज्वारीचे पीक जमिनीवर असल्याने पावसामुळे ज्वारीच्या कणसांना कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.

- संतोष गव्हाळे
हातरुण - खारपाणपट्टयातील शेतशिवारात ज्वारीचे उत्तम पीक शेतकर्‍यांना चार पैसे हाती देईल, अशी स्थिती असताना परतीच्या पावसाने ज्वारी काळी पडण्याच्या मार्गावर आहे. शेतात सोंगलेले ज्वारीचे पीक जमिनीवर असल्याने पावसामुळे ज्वारीच्या कणसांना कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.
   पेरणी केल्यानंतर अधून-मधून या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव झाला. ढगाळ वातावरणामुळे ज्वारीचे पीक उत्तम प्रकारे येऊ शकले नाही. ज्वारीच्या कणसांची वाढ झाली मात्र, कणसे सुकण्याच्या मार्गावर असतांना पावसाने हजेरी लावली. शेतशिवारात ज्वारी चे काढणीची प्रक्रिया सुरू असतांना परतीच्या पावसामुळे कणसं पावसाच्या पाण्यामुळे भिजले. त्यामुळे कणसांणा कोंब फुटले आहेत. पांढरी शुभ्र येणारी ज्वारी ही काळसर स्वरूपाची तयार होण्याची शक्यता आहे. निमकर्दा, हातरुण, शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा, हातला, मंडाळा, खांबोरा, बोरगाव, मांजरी, कंचनपूर, बादलापूर, अमानतपूर ताकोडा फाटा, अंदुरा शेतशिवारातील ज्वारी पीक अनेक ठिकाणी मातीत गेले आहे. कणसे काळी पडली आहेत. तसेच दाण्याला कोंब फुटले असून बुरशी आली आहे. परतीच्या पावसाची रिपरिप गेल्या तीन दिवसांपासून सुरू असल्याने सोगलेले सोयाबीन, ज्वारी कणसे भिजली असून पावसापासून पिकाचा बचाव करण्यासाठी गंजी वर ताडपत्री ने झाकून ठेवण्याची लगबग दिसून आली.  उडीद, सोयाबीन आणि ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सातत्याने मागील तीन ते चार वर्षांपासून सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. मुंग, उडीद, सोयाबीन पिकाचा पेरणीपासून केलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसामुळे थंडीसुद्धा वाढली आहे. पिके काढणीत असताना पाऊस झाल्यामुळे उत्पादन आणि दर्जावर परिणाम जाणवणार आहे. खरीप पिकांना सर्वाधिक झळ बसली आहे. परतीच्या पावसाने वेचणीचा कापूस भिजला आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेती कामांची लगबग कमी झाली.


निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

   मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने खारपाणपट्टयातील शेतशिवारात जोरदार हजेरी लावली. सध्या शेतशिवारात उडीद, सोयाबीन, ज्वारी काढणी चे काम सुरू असून कापूस वेचणीला सुरूवात झाली आहे. पावसाची रिपरिप सुरु असल्याने काढणीच्या कामात !अडचण निर्माण झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उडीद, सोयाबीन, ज्वारी पिकाला कोंब फुटले असून ज्वारी काळी पडली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अवकाळी पावसाने उडीद, सोयाबीन आणि ज्वारीला कोंब फुटले आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी सारखा सण तोंडावर असतांना निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे.
  - संजय घंगाळे, शेतकरी.
 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी