शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

राज्यात रब्बीची आतापर्यंत ३७ टक्केच पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 3:55 PM

राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे.

अकोला : राज्यात आतापर्यंत २१ लाख हेक्टर म्हणजेच ३७ टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस लांबल्याने यावर्षी रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असल्याचे तज्ज्ञाने म्हणणे आहे.राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. आतापर्यंत ९० टक्केच्यावर पेरणी अपेक्षित होती. तथापि, पाऊस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही पडल्याने खरीप हंगामातील पिके काढणीस विलंब झाला. परिणामी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मशागतीची कामे उशिरा सुरू झाली. त्यामुळे राज्यात सर्वत्र पेरण्यांना उशीर होत आहे. विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ६ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख व हजार हेक्टरवर म्हणजेच २६ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.दरवर्षी हरभरा पेरणी सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आाठवड्यापर्यंत तर गहू पिकाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते; परंतु यावर्षी ऋतूचक्र बदलले असून, जमीन ओली आहे. म्हणूनच या दोन्ही पिकांची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येईल, अशी शिफारस करण्यात आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गहू पेरणी १५ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

- सिंचनाला पाणी उपलब्धराज्यात जवळपास सर्वच धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने धरणांच्या क्षेत्रात येणाºया रब्बी पिकांना पाणी मिळणार आहे. म्हणूनच शेतकरी यावर्षी गव्हाची पेरणी १५ जानेवारीपर्यंत करण्याची शक्यता आहे. काही भागात कोरडवाहू क्षेत्रावरही शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली आहे.

 रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असून, गहू, हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत केली जाते. यावर्षी १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करता येईल, अशी शिफारस करण्यात आली आहे.- डॉ.एन.आर. पोटदुखे,विभागप्रमुख,कडधान्य विभाग,डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी