शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

राज्यमंत्री बच्चू कडू यांना अटकेपासून संरक्षण; न्यायालयाने दिला दिलासा, ९ मे रोजी होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 19:51 IST

या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून कडू यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी अर्ज केला.

अकाेला : रस्त्ये कामात अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेल्या प्रकरणात राज्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर कडू यांनी गुरूवारी अटकपूर्व जामिनासाठी अकाेल्याच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत दिलासा दिला आहे. या अंतरिम जामिनानंतर आता ९ मे राेजी सुनावणी हाेणार आहे.

जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करून कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ३ डिसेंबर रोजी सिटी काेतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे वंचित तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत याचिका न्यायालयात दाखल केली होती. या याचीकेची दखल घेत न्यायालयाने बुधवार २७ एप्रिलच्या रात्री ना.कडू यांच्यावर गुन्हे दाखल केले हाेते.

या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून कडू यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली, मात्र, अटक पूर्व जामिनीवर निर्णय देण्यापूर्वी सरकार पक्षाची बाजू ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी ९ मे रोजी निश्चित केली आहे. तोपर्यंत बच्चू कडू यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे ९ मेपर्यंत पालकमंत्र्यांना दिलासा मिळाला आहे. ना. कडू यांच्यातर्फे न्यायालयात ॲड. बी.के. गांधी बाजू मांडली.

पालकमंत्र्यांनी संविधानाचा सन्मान करायला शिकल पाहिजे. आज न्यायालयाचा जो निकाल आला त्याला सविस्तर वाचून आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. ज्या न्याय व्यवस्थेला बच्चू कडू यांनी दोष दिले त्याच न्याय व्यवस्थेने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे, हे लक्षात ठेवावे.- डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूCourtन्यायालय