शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार्‍यांनी पाडले कांद्याचे भाव

By admin | Updated: May 11, 2014 23:10 IST

शेतकरी हवालदिल

तेल्हारा : तेल्हारा तालुका हा बागायती क्षेत्रात मोडतो. तालुक्यातील अडगाव, बेलखेड, तळेगाव, माळेगाव, दानापूर परिसरात कांद्याचा भरपूर पेरा आहे; परंतु व्यापार्‍यांनी कांद्याचे भाव अचानक पाडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाळा जास्त झाल्याने शेतकर्‍यांचे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी हे खरीप पीक हातचे गेले. त्यानंतर शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू व कांदा पिकांची लागवड केली. कांदा पिकाला प्रतिएकर जवळपास २० ते २५ हजार रुपयांचा खर्च आला. त्यात फेब्रुवारी महिन्यात गारपिटीचा तडाखा बसल्याने काही भागांमधील कांदा सडला. काही भागांमध्ये कांद्याचे उत्पादन चांगले होत आहे. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांकडून सुरुवातीला ७०० ते ८५० रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची खरेदी केली. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गत काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला. व्यापार्‍यांनी या संधीचा फायदा घेत कांद्याचे भाव अचानक पाडले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडद्वारे कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी गोपाल अग्रवाल, मनोज राऊ, प्रवीण खारोडे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.