शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

घरकुलांसाठी गावातील स्रोतांतूनच वाळू देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 2:55 PM

अकोला: नद्यांमधील वाळू घाटातून उपसा करण्यास पर्यावरण विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील घरकुलांची कामे अपूर्ण असून, ती निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यासाठी गावशिवारातील नद्यांचे शेतामधून पडलेले प्रवाह, नाले, तलावातून वाळू देण्याची तयारी शासनाने केली.

अकोला: नद्यांमधील वाळू घाटातून उपसा करण्यास पर्यावरण विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील घरकुलांची कामे अपूर्ण असून, ती निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यासाठी गावशिवारातील नद्यांचे शेतामधून पडलेले प्रवाह, नाले, तलावातून वाळू देण्याची तयारी शासनाने केली. त्यासाठी वाळू उपशाची ठिकाणे, गावनिहाय लाभार्थी संख्येचा ताळमेळ अद्याप तयार नाही. ते काम तातडीने करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.ग्रामस्थांना स्वत:च्या वापरासाठी वाळू काढण्यासाठी शासनाने १७ आॅक्टोबर २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ज्या वाळू घाटांना पर्यावरण विभागाने उपसा करण्यासाठी मंजुरी दिली आहे; मात्र त्या वाळू घाटांचा लिलाव शासनाने ठरविलेल्या किमतीत झाला नाही, त्या घाटातील वाळू ग्रामस्थांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गावातील कोणालाही वाळूची गरज असल्यास त्यांना पाच ब्रासपर्यंत वाळूचा उपसा त्या घाटातून करता येईल. त्या घाटातून वाळू घेण्यासाठी प्रचलित दरानुसार पाच ब्रासची रॉयल्टी जमा करावी लागणार आहे. वाळूची वाहतूक स्वखर्चाने करावी लागणार आहे.त्याशिवाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस कोणतेही शुल्क न घेता घराच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत वाळू काढण्यास परवानगी दिली जाणार आहे. संबंधितांनी वाळू उपसा करण्यासाठी अर्ज केल्यानंतर तहसीलदार १५ दिवसांत परवानगी देणार आहेत. घाटातून वाळूचा उपसा, वाहतूक लाभार्थींना करण्याचे ठरले; मात्र पर्यावरण विभागाची मंजुरीच न मिळाल्याने वाळू घाटांंचा लिलावच झाला नाही. परिणामी, कोणत्या घाटातून वाळू द्यावी, हेही निश्चित झाले नाही.- विभागीय आयुक्तांचा तोडगात्यावर अमरावती विभागीय आयुक्तांनी ४ फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देत घरकुलासाठी वाळू देण्याचा नवा पर्याय सांगितला. त्यानुसार गाव स्तरावर वाळू उपसा करता येणारी ठिकाणे तहसीलदारांनी निश्चित करावी, गटविकास अधिकाºयांनी लाभार्थींची यादी तयार ठेवावी, वाळूची उपलब्धता आणि लाभार्थींच्या संख्येचा ताळमेळ घेऊन लाभार्थींना वाळू उपसा करण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.- सहा हजार घरकुले अपूर्ण!गेल्या तीन वर्षांत ग्रामीण भागातील लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून १८८३६ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ६५०० घरकुले अपूर्ण आहेत. सोबतच रमाई आवाससाठी चार हजार लाभार्थींची निवडही या वर्षात झाली. त्या सर्वांना वाळूची गरज आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू