शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By मोरेश्वर येरम | Updated: November 20, 2020 18:33 IST

वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देवीज कापल्यास वीज जोडणीची जबाबदारी घेणार वंचितवीज बिल माफीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवल्याचा आरोपराज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवतायत की मंत्री? आंबेडकरांचा सवाल

अकोलाराज्यात ५० टक्के वीज बिल माफ होऊ शकते असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता, पण हा प्रस्ताव राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवला, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

वीज बिल माफीच्या मुद्यावरुन राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी याआधी नांदेड येथील पत्रकार परिषेदत उपस्थित केला होता. यासोबतच राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. 

अकोला येथे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत की  एखादा मंत्री? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

वीज कापल्यास वीज जोडणीची जबाबदारी घेणार वंचितवीज बिल माफ केलं नाही, तर कुणीही वीज बिल भरू नये. ज्यांची वीज कापली जाईल त्यांची वीज जोडून देण्याची जबाबदारी वंचित घेईल, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली आहे. 

मनसेही आक्रमकवाढीव वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कापण्यास कुणी आलं तर त्यांना मनसे स्टाइल शॉक देऊ असा इशाराच मनसेनेच्या नेत्यांनी दिला आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरुन येत्या काळात मनसेकडून मोठं आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यात जनतेकडून बळजबरीनं वीज बिल घेतलं जाणार अशेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा, अशा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीelectricityवीजAkolaअकोला