शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जुने शहरात पाण्यासाठी नागरिकांचे हाल; टॅंकर येताच धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 10:55 IST

Water Scarcity in Akola City : जुने शहरातील बहुतांश भागात पाण्याअभावी गरीब नागरिकांचे हाल हाेत आहेत.

अकाेला : शहरात सत्तापक्ष व मनपा प्रशासनाकडून ‘अमृत अभियान’अंतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा गवगवा केला जात असला तरी अद्यापही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पाणी पाेहाेचले नसल्याची परिस्थिती आहे. जुने शहरातील बहुतांश भागात पाण्याअभावी गरीब नागरिकांचे हाल हाेत आहेत. अशा भागात मनपाचे टॅंकर पाेहाेचताच पाण्यासाठी महिलांसह पुरुष व लहान मुलांची धावाधाव हाेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा व्हावा,यासाठी केंद्र शासनाने ‘अमृत अभियान’अंतर्गत जलवाहिनीचे जाळे बदलणे व नवीन आठ जलकुंभांची उभारणी करण्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त भूमिगत गटार याेजनेचाही समावेश आहे. दरम्यान, जलवाहिनीचे जाळे बदलणे व नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या कामाला २०१७ मध्ये प्रारंभ झाला. दाेन वर्षात हे काम पूर्ण करण्याची मुदत असताना अद्यापही या कामाचे भिजत घाेंगडे कायम असल्याचे दिसत आहे. परिणामी गरजू नागरिकांना अद्यापही पाणीपुरवठा हाेत नसल्याने त्यांची पाण्यासाठी धावाधाव हाेत आहे. जुने शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील श्रध्दा काॅलनी, जाजू नगर, अंबिका नगर परिसर, राव नगर, प्रभाग ९ मधील आरपीटीएस राेड, भगिरथ वाडी यांसह प्रभाग क्रमांक १ मधील वाकापूर, नायगाव, शिलाेडा, प्रभाग क्रमांक २ व प्रभाग ३ मधील परिसरात पाणीटंचाईची समस्या आहे. संबंधित प्रभागात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा हाेत नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून मनपाच्यावतीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

 

पाण्यासाठी नागरिकांची झुंबड

मनपाच्यावतीने पाणीटंचाई असलेल्या प्रभागांसाठी दरराेज टॅंकरच्या किमान २२ फेऱ्या हाेतात. याव्यतिरिक्त खासगी टॅंकरद्वारेही पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. प्रभागात टॅंकर येताच पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याचे पहावयास मिळत आहे.

 

मनपाकडून शुल्काची आकारणी नाही !

मनपाकडून गरजू नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असताना त्याबदल्यात काेणतेही शुल्क आकारले जात नाही. केवळ खासगी टॅंकरधारकांकडूनच ४०० ते ८०० रुपये शुल्क वसूल केले जात आहे.

टॅग्स :Akola Old cityअकोला जुने शहरAkolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई