शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या वाढीव मालमत्ता कर विरोधात अ‍ॅड. आंबेडकरांनी मांडली उच्च न्यायालयात बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:52 IST

शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान भारिप-बमंसचे नेते माजी खासदार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात स्वत: युक्तिवाद केला.

अकोला: अकोला महानगरपालिकेने एप्रिल २०१७ मध्ये घेतलेल्या ठरावानुसार मालमत्ताधारकांचा कर (टॅक्स) तीन ते चारपट वाढविला. या अवास्तव करवाढीविरोधात भारिपचे बहुजन महासंघातर्फे नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान भारिप-बमंसचे नेते माजी खासदार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात स्वत: युक्तिवाद केला. व्यस्त वेळातून वेळ काढून त्यांनी करवाढीबाबत सर्वसामान्य अकोलेकरांची बाजू मांडली. अ‍ॅड. आंबेडकरांनी केलेल्या सडेतोड युक्तिवादानंतर न्यायालयाने याप्रकरणी अंतिम सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. यावेळी अ‍ॅॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह नागपूर उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. संदीप चोपडे, याचिकाकर्र्त्या भारिपच्या गटनेता अ‍ॅड. धनश्री देव, बबलू जगताप, किरणताई बोराखडे, अ‍ॅड. संतोष रहाटे, बालमुकुंद भिरड, मन्नुसेठ पंजवानी, नंदकिशोर निलखन प्रामुख्याने उपस्थित होते.अकोला महानगरपालिकेने अकोलेकरांवर बेकायदेशीर लादलेल्या मालमत्ता कर (टॅक्स) विरोधात अ‍ॅॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रचंड आंदोलक भूमिका घेतली आहे. पक्षाच्यावतीने मोर्चे, धरणे आदी विविध आंदोलने झालीत. विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर प्रकरणी तक्रार दाखल करीत वेळोवेळी युक्तिवाद केला. सोबतच याप्रकरणी अकोलेकरांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारकडे अ‍ॅॅड. आंबेडकर यांनी प्रकरण लावून धरले. भारिपबमसंच्या नगरसेवकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्य सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा या करिता याचिका दाखल केली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरHigh Courtउच्च न्यायालय