शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मनपाच्या वाढीव मालमत्ता कर विरोधात अ‍ॅड. आंबेडकरांनी मांडली उच्च न्यायालयात बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:52 IST

शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान भारिप-बमंसचे नेते माजी खासदार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात स्वत: युक्तिवाद केला.

अकोला: अकोला महानगरपालिकेने एप्रिल २०१७ मध्ये घेतलेल्या ठरावानुसार मालमत्ताधारकांचा कर (टॅक्स) तीन ते चारपट वाढविला. या अवास्तव करवाढीविरोधात भारिपचे बहुजन महासंघातर्फे नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान भारिप-बमंसचे नेते माजी खासदार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात स्वत: युक्तिवाद केला. व्यस्त वेळातून वेळ काढून त्यांनी करवाढीबाबत सर्वसामान्य अकोलेकरांची बाजू मांडली. अ‍ॅड. आंबेडकरांनी केलेल्या सडेतोड युक्तिवादानंतर न्यायालयाने याप्रकरणी अंतिम सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. यावेळी अ‍ॅॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह नागपूर उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. संदीप चोपडे, याचिकाकर्र्त्या भारिपच्या गटनेता अ‍ॅड. धनश्री देव, बबलू जगताप, किरणताई बोराखडे, अ‍ॅड. संतोष रहाटे, बालमुकुंद भिरड, मन्नुसेठ पंजवानी, नंदकिशोर निलखन प्रामुख्याने उपस्थित होते.अकोला महानगरपालिकेने अकोलेकरांवर बेकायदेशीर लादलेल्या मालमत्ता कर (टॅक्स) विरोधात अ‍ॅॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रचंड आंदोलक भूमिका घेतली आहे. पक्षाच्यावतीने मोर्चे, धरणे आदी विविध आंदोलने झालीत. विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर प्रकरणी तक्रार दाखल करीत वेळोवेळी युक्तिवाद केला. सोबतच याप्रकरणी अकोलेकरांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारकडे अ‍ॅॅड. आंबेडकर यांनी प्रकरण लावून धरले. भारिपबमसंच्या नगरसेवकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्य सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा या करिता याचिका दाखल केली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरHigh Courtउच्च न्यायालय