शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

लग्न समारंभ, साेहळ्यात गर्दी; काेचिंग क्लासमध्येच काेराेना हाेताे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:06 IST

CoronaVirus जिल्हा प्रशासन व शासनाने सकारात्मकदृष्ट्या पाहणे गरजेचे असल्याचे मत काेचिंग क्लास संचालकांनी साेमवारी ‘लाेकमत’कडे व्यक्त केले.

अकाेला : जिल्हा प्रशासनाने ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न समारंभ व इतर साेहळ्यांना दिलेल्या परवानगीचे नागरिकांनी तीनतेरा वाजविले आहेत. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये माेठ्या व्यक्तींसह लहान मुलांची गर्दी हाेत असताना केवळ काेचिंग क्लासमध्येच मुलांना काेराेनाची लागण हाेते का, असा संतप्त सवाल पालक वर्गातून उपस्थित हाेऊ लागला आहे. माेबाइलमुळे ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना व पर्यायाने पालकांना सहन करावे लागत आहेत. या विषयाकडे जिल्हा प्रशासन व शासनाने सकारात्मकदृष्ट्या पाहणे गरजेचे असल्याचे मत काेचिंग क्लास संचालकांनी साेमवारी ‘लाेकमत’कडे व्यक्त केले.

काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील दहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांना माेबाइलद्वारे ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य शासनाने घेतलेला निर्णय याेग्य असला तरी शासनाने टाळेबंदी शिथिल करीत सर्वच उद्याेग, व्यवसाय सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या उद्याेगांना ‘बुस्टर डाेस’ देण्याचे धाेरण अवलंबिले जात आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची अट नमूद करीत ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न, धार्मिक साेहळे, समारंभ साजरे करण्याला परवानगी देण्यात आली आहे. संबंधित कार्यक्रमांमध्ये काेराेनाच्या नियमावलीला पायदळी तुडवीत नागरिक माेठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. लग्नाच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरला जात आहे. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी मुलांना काेराेनाची लागण न हाेता ती केवळ शिकवणी वर्गातच हाेते का, असा संतप्त सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.

 

ऑनलाइन शिक्षणामुळे सर्वाधिक नुकसान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाेत आहे. माेबाइलवर शिकवणीदरम्यान विद्यार्थी विचलित हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑफलाइनमध्ये विद्यार्थी शिक्षकांसाेबत सहजतेने संवाद साधू शकतात.

-भालचंद्र सुर्वे संचालक, सिद्धांत काेचिंग क्लासेस

 

ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्याचे विद्यार्थी सांगतात, तसेच ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने त्यांचे आराेग्य धाेक्यात आले असून, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहरात इतर कार्यक्रम माेठ्या धडाक्यात सुरू असताना ऑफलाइन शिक्षणावरील निर्बंध अनाकलनीय ठरत आहेत.

-वसीम चाैधरी संचालक, चाैधरी काेचिंग क्लासेस

 

 

विद्यार्थी घरी मन लावून अभ्यास करीत नाहीत, ऑनलाइन क्लासच्या नावाखाली माेबाइलचा दुरुपयाेग वाढल्याची चिंता पालकांमधून व्यक्त केली जात आहे. शासनाने इयत्ता ९ वी, १० वी व १२ वीचे वर्ग सुरू केले. अशा स्थितीत ऑफलाइन शिकवणीला आडकाठी अपेक्षित नाही. शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी पालक आग्रही आहेत.

-विवेक शास्त्रकार संचालक, उत्कर्ष एज्युकेशन

 

यंदा काेराेनामुळे शासनाने १० वीचा अभ्यासक्रम कमी केला. ८० टक्के विद्यार्थी जेइइ, नीट आदी परीक्षेच्या माध्यमातून भविष्याची पेरणी करीत असतात. अशा परीक्षेसाठी मेहनत व परिश्रमाची गरज असताना ऑनलाइन प्रणालीमुळे यावर पाणी फेरले गेले असून अभ्यासाचा पाया कमजाेर झाला आहे. विद्यार्थ्यांमध्येही गाेंधळाची स्थिती असून ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यासाठी ऑफलाइन क्लास हाच पर्याय आहे.

- हरणित सिंग संचालक, ब्राइट करिअर एज्युकेशन

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीEducationशिक्षण