शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

 बोगस बियाणे प्रकरणी हलगर्जी केल्यास कारवाई करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 4:05 PM

अकोला : बियाणे, खत, कीटकनाशकांचे नमुने तपासणीत बोगस आढळून आल्यास ठरलेल्या मुदतीत प्रकरण न्यायालयात दाखल न करणाऱ्या बियाणे निरीक्षकांसह संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे.

अकोला : बियाणे, खत, कीटकनाशकांचे नमुने तपासणीत बोगस आढळून आल्यास ठरलेल्या मुदतीत प्रकरण न्यायालयात दाखल न करणाऱ्या बियाणे निरीक्षकांसह संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रकरणात बियाणे निरीक्षकाला दंड झाल्याने कृषी विभाग आता ताळ्यावर आला आहे.हंगामात बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. हा प्रकार रोखण्यासाठी पेरणीपूर्वी किंवा त्यानंतर बियाणे नमुने तपासणी केली जाते. त्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये ते अप्रमाणित (बोगस) आढळून येतात. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही बियाणे निरीक्षकांनी कंपन्यांशी हातमिळवणी करून पुढील कारवाईस फाटा दिल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे, ही बाब थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोरच उघड झाली.सोयाबीन बियाण्यांचा नमुना अप्रमाणित असताना संबंधित बियाणे निरीक्षकाने प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात कमालीची दिरंगाई केली. ही बाब उघड झाल्याने न्यायालयाने बियाणे निरीक्षकांच्या कामकाजाचे वाभाडे काढले. प्रकरणही खारीज केले. निरीक्षकाला २० हजार रुपये दंड करून तो अर्जदारास देण्याचा आदेशही प्रकरण क्रमांक १११०-२०१८ मध्ये दिला. न्यायालयाच्या ताशेऱ्यांमुळे अडचणीत आलेला कृषी विभाग आता ताळ्यावर आला आहे. कोणत्याही कंपनीच्या बियाण्यांचे, खत, कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल प्राप्त होताच न्यायालयात प्रकरण दाखल करणे बंधनकारक आहे. बियाणे निरीक्षकाने कायद्यातील मुदतीत प्रकरण दाखल न केल्यास संबंधित निरीक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा आदेश राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिल्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र