शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

अमरावती विभागातील प्रकल्पांत केवळ ११ टक्के जलसाठा

By admin | Published: June 11, 2016 2:48 AM

अमरावती विभागात २८९ गावांत २७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

प्रफुल्ल बाणगावकर / कारंजा लाड (जि. वाशिम) अमरावती विभागातील लहान- मोठे मिळून एकू ण ४६0 जलप्रकल्पात केवळ ११ टक्के जलसाठा उरला असून, मॉन्सूनचे दमदार आगमन झाले नाही, तर विभागातील पाचही जिल्ह्यात येत्या काही दिवसांत पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.मागील तीन वर्षांपासून अमरावती विभागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील विविध ठिकाणच्या जलप्रकल्पात पुरेसा जलसंचय झाला नाही. त्यामुळे उन्हाळा लागण्यापूर्वीच अनेक जलप्रकल्प कोरडे झाले, तर काही प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती मिळून या पाच जिल्ह्यांत एकूण लहान-मोठे ४६0 जलप्रकल्प आहेत. या जलप्रकल्पात ९ जून २0१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागात अमरावती येथील उध्र्व वर्धा, यवतमाळ येथील पूस, बेंबळा आणि अरुणावती, अकोला येथील काटेपूर्णा, तर बुलडाणा येथील वाण, नळगंगा, पेनटाकळी, आणि खडकपूर्णा असे एकूण ९ मोठे जलप्रकल्प आहेत. त्यापैकी पूस, पेनटाकळी आणि खडकपूर्णा हे प्रकल्प कोरडे पडले असून, अरुणावती प्रकल्पात ३ टक्के, काटेपूर्णा प्रकल्पात २ टक्के, तर नळगंगा प्रकल्पात ४ टक्के जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पात १३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील वाण प्रकल्पात ३७ टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता येत्या काही दिवसांत मॉन्सूनचे आगमन जोरदार झाले नाही, तर पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अमरावती विभागात प्रशासनाच्यावतीने एकूण २८९ गावांत २७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.