शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यात टँकरची संख्या घटली; पाच वर्षांतील नीचांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 09:38 IST

Akola News : टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे२०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा मागील वर्षीच्या दमदार पावसाचा परिणाम

अकोला : सलग दोन वर्षे झालेल्या दमदार पावसामुळे राज्यात प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी आहे. परिणामी, टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. यावर्षी राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांत प्रथमच टँकरची संख्या कमी नोंदविली गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्यावर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. विहिरीत आणि बोअरवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. परिणामी, चालूवर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.

 

२२ जिल्ह्यांत शून्य टँकर

राज्यात टँकरची संख्या कमी झाली आहे. यामध्ये २२ जिल्ह्यांमध्ये एकही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज अद्याप भासली नाही, तर नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्य आहे.

--बॉक्स--

मराठवाड्यात केवळ नऊ टँकर

गेल्या वर्षी सर्वाधिक पाणीटंचाई भासलेल्या औरंगाबाद विभागात केवळ नऊ टँकर सुरू झाले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात दोन, तर नांदेड जिल्ह्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

 

पाच वर्षांतील टँकर संख्या

२०१७ - ७९८

२०१८ - ९३७

२०१९ - ५१७४

२०२० - ३२०

२०२१ - २०२

 

कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा

पाणीटंचाई विदर्भाच्या वाट्याला पाचवीला पुजलेली आहे. राज्यात टँकरची संख्या घटली असली तरी कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कोकणात ९१, पश्चिम विदर्भात ४३, नाशिक विभागात ३०, तर पुणे विभागात २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

 

कोरोनाच्या स्थितीत दिलासादायक चित्र

सध्या राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोणी व्हेंटिलेटरसाठी, तर कोणी बेडसाठी भटकत आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई