शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात टँकरची संख्या घटली; पाच वर्षांतील नीचांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 09:38 IST

Akola News : टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे२०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा मागील वर्षीच्या दमदार पावसाचा परिणाम

अकोला : सलग दोन वर्षे झालेल्या दमदार पावसामुळे राज्यात प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी आहे. परिणामी, टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. यावर्षी राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांत प्रथमच टँकरची संख्या कमी नोंदविली गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्यावर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. विहिरीत आणि बोअरवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. परिणामी, चालूवर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.

 

२२ जिल्ह्यांत शून्य टँकर

राज्यात टँकरची संख्या कमी झाली आहे. यामध्ये २२ जिल्ह्यांमध्ये एकही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज अद्याप भासली नाही, तर नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्य आहे.

--बॉक्स--

मराठवाड्यात केवळ नऊ टँकर

गेल्या वर्षी सर्वाधिक पाणीटंचाई भासलेल्या औरंगाबाद विभागात केवळ नऊ टँकर सुरू झाले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात दोन, तर नांदेड जिल्ह्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

 

पाच वर्षांतील टँकर संख्या

२०१७ - ७९८

२०१८ - ९३७

२०१९ - ५१७४

२०२० - ३२०

२०२१ - २०२

 

कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा

पाणीटंचाई विदर्भाच्या वाट्याला पाचवीला पुजलेली आहे. राज्यात टँकरची संख्या घटली असली तरी कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कोकणात ९१, पश्चिम विदर्भात ४३, नाशिक विभागात ३०, तर पुणे विभागात २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

 

कोरोनाच्या स्थितीत दिलासादायक चित्र

सध्या राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोणी व्हेंटिलेटरसाठी, तर कोणी बेडसाठी भटकत आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई