शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात टँकरची संख्या घटली; पाच वर्षांतील नीचांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 09:38 IST

Akola News : टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे२०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा मागील वर्षीच्या दमदार पावसाचा परिणाम

अकोला : सलग दोन वर्षे झालेल्या दमदार पावसामुळे राज्यात प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी आहे. परिणामी, टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. यावर्षी राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांत प्रथमच टँकरची संख्या कमी नोंदविली गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्यावर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. विहिरीत आणि बोअरवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. परिणामी, चालूवर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.

 

२२ जिल्ह्यांत शून्य टँकर

राज्यात टँकरची संख्या कमी झाली आहे. यामध्ये २२ जिल्ह्यांमध्ये एकही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज अद्याप भासली नाही, तर नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्य आहे.

--बॉक्स--

मराठवाड्यात केवळ नऊ टँकर

गेल्या वर्षी सर्वाधिक पाणीटंचाई भासलेल्या औरंगाबाद विभागात केवळ नऊ टँकर सुरू झाले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात दोन, तर नांदेड जिल्ह्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

 

पाच वर्षांतील टँकर संख्या

२०१७ - ७९८

२०१८ - ९३७

२०१९ - ५१७४

२०२० - ३२०

२०२१ - २०२

 

कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा

पाणीटंचाई विदर्भाच्या वाट्याला पाचवीला पुजलेली आहे. राज्यात टँकरची संख्या घटली असली तरी कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कोकणात ९१, पश्चिम विदर्भात ४३, नाशिक विभागात ३०, तर पुणे विभागात २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

 

कोरोनाच्या स्थितीत दिलासादायक चित्र

सध्या राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोणी व्हेंटिलेटरसाठी, तर कोणी बेडसाठी भटकत आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई