शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘वाळवंटी टोळ’चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 17:45 IST

आपल्या राज्यात सहसा ही कीड येत नाही व सध्या आली नाही, असे असले तरी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी राज्याच्या कृषी यंत्रणेला दिला आहे.

- राजरत्न शिरसाट

अकोला: अगोदरच पिके किडींनी पोखरली असताना आता नव्याने ‘बहुभक्ष्यीय उपद्रवी (टोळधाड) कीड वाळवंटी टोळ’चा धोका निर्माण झाला असून, सद्यस्थितीत राजस्थान व गुजरात राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यात या किडीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. ही टोळधाड संपूर्ण पीक उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या राज्यात सहसा ही कीड येत नाही व सध्या आली नाही, असे असले तरी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी राज्याच्या कृषी यंत्रणेला दिला आहे.१९२६ मध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर १९३१, ४९, ५५, ७८ च १९९३ मध्ये सुद्धा देशात या किडीने थैमान घातले होते. वाळवंटी टोळ किंवा नाकतोड असे या किडीचे शास्त्रीय नाव आहे. पुरातन काळापासून ही कीड अस्तित्वात आहे. संस्कृत वाङ्मयात इ.स. पूर्वी ४०० वर्षांमध्येसुद्धा या किडीचा उल्लेख आढळून आला असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी दिली.वाळवंटी कीड ही मोठ्या प्रमाणात पिके व वनस्पती, झाडाझुडुपांचे नुकसान करते. एकटी व समूह असे या किडीचे दोन प्रकार आहेत. यातील समूह अवस्थेतील कीड पिकाचे प्रचंड नुकसान करते. या किडीचा थव्यामध्ये १० हत्ती, २५ उंट किंवा २,५०० माणसे खातील एवढे अन्न एका दिवसात फस्त करण्याची क्षमता आहे. म्हणूनच या किडीच्या नियंत्रणासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येते. ही कीड प्रादुर्भावग्रस्त देशामध्ये लक्ष ठेवण्यासाठी टोळ संरक्षण यंत्रणा उभारलेली आहे. भारतातील राजस्थान व गुजरात राज्यातील वाळवंटी भागातील यंत्रणा या किडीवर वर्षभर लक्ष ठेवून असते. यासाठी नियमित सर्वेक्षण केले जाते. किडीची संख्या आर्थिक नुकसानाच्या पातळीवर म्हणजेच प्रतिहेक्टर १० हजार प्रौढ किडे किंवा पाच ते सहा प्रतिझुडूप आढळून आल्यास टोळ प्रतिबंधक यंत्रणा राज्याला सजग करू न नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ, वाहने व रासायनिक कीटकनाशके उपलब्ध करू न दिली जातात. दरम्यान, केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने या किडीच्या व्यवस्थापनासाठी कुठल्याही कीटकनाशकांची शिफारस केलेली नाही. या टोळ किडीचा शेतात प्रवेश होऊ नये म्हणून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे, तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे आदींचा समावेश करण्यात आला असल्याचे डॉ. उंदिरवाडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी