शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

मुलाखत : अनाथ नव्हे ‘स्वनाथ’; दृष्टीकोण बदलणे गरजेचे! - सुलक्षणा अहेर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:58 AM

अनाथांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे, असे मत ‘अनाथांचे आधार’, एकच धर्म मानव धर्म या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा अहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- राजू चिमणकरअकोला : अपंगांना ज्याप्रमाणे दिव्यांग संबोधल्या जाते त्याचप्रमाणे अनाथांना स्वनाथ संबोधण्यात यावे. १८ वर्षांनंतर अनाथ मुला-मुलींच्या भवितव्याचा फार मोठा प्रश्न आहे. शासनाने अनाथांच्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अनाथांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे, असे मत ‘अनाथांचे आधार’, एकच धर्म मानव धर्म या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा अहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. उत्कर्ष शिशुगृह, गायत्री बालिकाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्रेह संगम २०१८ च्या सोहळ््यासाठी त्या अकोल्यात आल्या होत्या. त्यांच्या कार्याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद. 

प्रश्न : ‘अनाथांचे आधार’ची संकल्पना समाजात कशी रुजली?वयाच्या १८ वर्षांनंतर अनाथाश्रमातील मुला-मुलींना बाहेर काढले जाते. त्यांच्यासमोर मोठे संकटच उभे राहते. त्यांचा गैरफायदा घेत अनाथ मुला-मुलींना वाममार्गाला लावले जाते. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारीचे कृत्य घडू नये, यासाठी राज्यभरातील १८ वर्षांनंतरच्या मुला-मुलींना भक्कमपणे पाठबळ मिळावे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्या करिअरसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने ‘अनाथांचे आधार’ संकल्पना तयार झाली. ती आता खºया अर्थाने समाजामध्ये रुजत आहे. विविध उपक्रमांना समाजदूतांकडून मदतीचा हात मिळत आहे. 

प्रश्न : सध्या आपले कार्यक्षेत्र ?राज्यभरातील दीडशेंवर १८ वर्षांवरील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी संस्था कार्यरत आहे. मुला-मुलींमध्ये राज्यातील मुला-मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे अनाथ मुला-मुलींनी स्वत:च पुढाकार घेऊन हे कार्य सुरू केले आहे. मुंबईचे अभय तेली, नागपूरचे अमित वासने, पुण्याच्या मयुरी जोशी यांचाही या कार्यात मोठा वाटा आहे. गत पाच वर्षांपासून संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या कार्याला पोलिसांचा सपोर्ट मिळत आहे.     

प्रश्न : अनाथांच्या पुर्नवसनासाठी शासनाची भूमिका काय ?१८ वर्षांनंतरच्या अनाथ मुला-मुलींच्या पुर्नवसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यासाठी शासनाने महत्त्वाची भूमिका निभावणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अनाथांना एक टक्का आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. म्हाडा, सिडकोमध्ये अनाथ मुला-मुलींना घरे देण्यात यावीत. शासनाने अनाथ मुला-मुलींच्या भविष्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शासनाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष दिल्यास अनाथांनासोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.

 प्रश्न : यंदाच्या महत्त्वाच्या उपक्रमाबाबत काय सांगाल ?अनाथांची दिवाळी हा उपक्रम यंदा नाशिकमध्ये घेण्यात येत आहे. यामध्ये १६ ते १९ नोव्हेंबर २०१८ दरम्यान राज्यातील अनाथ एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करणार आहेत. यानिमित्ताने विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक परिसराची भ्रमंती, विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांची भेट, अनाथ मुला-मुलींचे समुपदेशन, जीवनविषयक दृष्टीकोन सांगणारी शॉर्ट मुव्हीचे प्रदर्शन, कपड्यांसह विविध जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात येईल. अनाथ मुला-मुलींना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. अनाथ मुला-मुलींमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत