शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

असंसर्गजन्य आजार जाताहेत नियंत्रणापलीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 3:11 PM

राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

- प्रवीण खेतेअकोला : बदलती जीवनशैली अन् वाढत्या तणावामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांच्या यादीत कर्करोगापाठोपाठ रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ च्या अहवालानुसार देशात ४० लाखांपेक्षा जास्त रुग्ण उच्च रक्तदाबाचे आढळले असून, राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.चुकीच्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे; परंतु धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष विषाणूजन्य आजारांपेक्षा जास्त उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगासारखे असंसर्गजन्य आजारांत लक्षणीय वाढ होत आहे. या असंसर्गजन्य आजारांनी देशभरात डोके वर काढले असून, कर्करोगापाठोपाठ मधुमेह अन् उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. असंसर्गजन्य आजारांची वाढती संख्या ही धोक्याची पातळी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ प्रकाशित केले. त्यानुसार, देशभरात एनसीडी केंद्रांतर्गत देशभरातील ६.५१ कोटी रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये देशभरात तब्बल ४० लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात एनसीडी केंद्रांतर्गत तब्बल २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.‘एनसीडी’ अंतर्गत राज्यात तपासणीराज्यभरात जिल्हा स्तरावर शासकीय रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनसीडी केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांतर्गत असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ च्या अहवालानुसार, राज्यात ५८ लाख ८३ हजार ९१५ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि स्ट्रोकसह इतर असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

असे आहे रुग्णांचे प्रमाण...आजार - तपासणी केलेल्या रुग्णांची संख्यामधुमेह - १,५५,६२८उच्च रक्तदाब - २,५०,८७५कर्करोग - १४,१०३स्ट्रोक - ४,०१५बदलत्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या आजारांच्या निदानासाठी राज्यात जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एनसीडी केंद्र कार्यरत आहेत. याच माध्यमातून अशा रुग्णांचे निदान करणे शक्य झाले आहे. केंद्र शासनाचा नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ अहवालातून समोर आलेली बाब चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य