शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

निपाहचा धोका नाही; तरी खबरदारी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 14:59 IST

अकोला : केरळ राज्यात निपाहच्या विषाणूने डोकं वर काढल्याने राज्यातही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र अद्याप तरी राज्यात ...

अकोला : केरळ राज्यात निपाहच्या विषाणूने डोकं वर काढल्याने राज्यातही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र अद्याप तरी राज्यात निपाहचा धोका नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये निपाह व्हायरसने ग्रस्त रुग्ण आढळला होता. निपाह विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत वर्षी केरळ राज्यात निपाह व्हायरसने १७ जणांचा बळी घेतला होता. विशेष म्हणजे या व्हायरसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अद्याप औषधच नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; परंतु महाराष्ट्रात सध्यातरी निपाह व्हायरसचा धोका नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.ही आहेत ‘निपाह’ची लक्षणे

  • ताप अधिक काळ राहणे
  • डोकेदुखी
  • सततच्या उलट्या
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • न्यूरोलॉजिकल समस्या
  • अंगदुखी
  • मेंदूज्वर

काय काळजी घ्यावी?

  1. झाडावरून जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत.
  2. लक्षणे दिसताच तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  3. या आजारावर कुठल्याही प्रकारचे औषध नसल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

‘निपाह’या विषाणूंचा प्रसार झपाट्याने होत असून, केरळ सर्वाधिक प्रभावीत झाले आहे. केरळमधील आठ जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे; मात्र राज्यात या विषाणूंचा धोका नसल्याने हाय अलर्ट दिलेला नाही. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यNipah Virusनिपाह विषाणू