शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निपाहचा धोका नाही; तरी खबरदारी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 14:59 IST

अकोला : केरळ राज्यात निपाहच्या विषाणूने डोकं वर काढल्याने राज्यातही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र अद्याप तरी राज्यात ...

अकोला : केरळ राज्यात निपाहच्या विषाणूने डोकं वर काढल्याने राज्यातही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र अद्याप तरी राज्यात निपाहचा धोका नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये निपाह व्हायरसने ग्रस्त रुग्ण आढळला होता. निपाह विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत वर्षी केरळ राज्यात निपाह व्हायरसने १७ जणांचा बळी घेतला होता. विशेष म्हणजे या व्हायरसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अद्याप औषधच नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; परंतु महाराष्ट्रात सध्यातरी निपाह व्हायरसचा धोका नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.ही आहेत ‘निपाह’ची लक्षणे

  • ताप अधिक काळ राहणे
  • डोकेदुखी
  • सततच्या उलट्या
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • न्यूरोलॉजिकल समस्या
  • अंगदुखी
  • मेंदूज्वर

काय काळजी घ्यावी?

  1. झाडावरून जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत.
  2. लक्षणे दिसताच तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  3. या आजारावर कुठल्याही प्रकारचे औषध नसल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

‘निपाह’या विषाणूंचा प्रसार झपाट्याने होत असून, केरळ सर्वाधिक प्रभावीत झाले आहे. केरळमधील आठ जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे; मात्र राज्यात या विषाणूंचा धोका नसल्याने हाय अलर्ट दिलेला नाही. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यNipah Virusनिपाह विषाणू