शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकरी अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:28 PM

व्यापाºयाकडून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीच आता बाजारात उतरला आहे. लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकºयावर अकोल्यात येऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे.

अकोला: पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पिकवलेल्या मोत्यांना घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापाºयाकडून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीच आता बाजारात उतरला आहे. लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकºयावर अकोल्यात येऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे.कांद्याला पन्नास, एक रुपये किलोने दर मिळत असल्यामुळे शेतकºयाचा कांदा विक्रीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी फुकटात कांदा देण्यासोबतच रस्त्यावर कांदा फेकून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवित आहेत. शेतमालाला भाव नाही. व्यापारी वाट्टेल त्या किमतीमध्ये कष्टाने पिकवलेला शेतमाल मागतो. शेतकºयाला नफा तर सोडाच, त्याने पिकवलेल्या शेतमाल लागवडीचा खर्चही निघत नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, व्यापाºयाला माल विकण्यापेक्षा त्याने आता स्वत:च मालाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी ट्रकने कांदा घेऊन अकोल्यात दाखल झाले आहेत. एक ते दोन रुपये किलो दराने कांदा विकण्यापेक्षा अकोल्यात ५0 ते ७0 रुपयांमध्ये दहा किलो कांद्यांची गोणी तयार करून हे शेतकरी विकत आहेत. बाजारामध्ये १५ रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने, नागरिकांनाही पाच ते सहा रुपये किलो दराने कांदा स्वस्त मिळत आहे. त्यामुळे या शेतकºयांना अकोल्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठेतील भावापेक्षा स्वविक्रीतून शेतकºयांच्या कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे अकोल्यात दररोज दोन ते तीन ट्रक कांदा नाशिकवरून येत आहे. जिल्हा कारागृहासमोर ट्रक उभा करून हे शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत. या विक्रीतून शेतकºयांच्या कांद्याला ७00 ते ८00 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी