शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

नारायण राणे गंजलेली ताेफ; फडणवीस यांचा अनुभव कमी पडताे - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 10:36 AM

Jayant Patil Press in Akola अजून चार वर्ष ताे अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

ठळक मुद्देकाेल्यात शुक्रवारी घेतलेल्या सभेनंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. भारतीय जनता पक्षात गेलेल्या नेत्यांना आता आपली मुस्कटदाबी हाेते असे वाटत आहे.

अकाेला: महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे काम करत आहे. ते सक्षम आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आराेप करत सुटले आहे. फडणवीसांना विराेधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू आहे, तर नारायण राणे हे गंजलेली ताेफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गाेळ्यांना आम्ही अन् माताेश्रीही महत्त्व देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टाेला हाणला.

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ अकाेल्यात शुक्रवारी घेतलेल्या सभेनंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की राज्यात काेराेना आटाेक्यात आला आहे. अजून प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे भाजपावाले सरकार पाडण्याचे राेज मुहूर्त काढत आहेत. त्यांच्या मुहूर्तामध्येच आम्ही वर्षपूर्तीकडे वाटचाल केली आहे. सत्ता गेल्याचे दु:ख ते पचवू शकले नाही. त्यामुळे सरकारवर बेछुट आराेप करीत आहे. त्यांची सारी उठाठेव ही चर्चेत राहण्यासाठीच आहे. त्यांना विराेधी पक्षनेते पद किती गांभीर्याने घ्यावे लागते, याचा अनुभव नाही. त्यांनी अजून चार वर्ष ताे अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

 भाजपातील काही आमदार संपर्कात

इतर पक्षातून भारतीय जनता पक्षात गेलेल्या नेत्यांना आता आपली मुस्कटदाबी हाेते असे वाटत आहे, तर उपऱ्यांना पदे मिळाली व भाजप निष्ठावंत उपेक्षीत राहिले, अशी भावना त्यांच्या पक्षातील अनेक आमदारांची आहे. असे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. सध्याच किती आहेत, याचा आकडा जाहीर करणे याेग्य नाही; मात्र अशा काठावरच्या आमदारांना दिलासा देण्यासाठीच आमचे सरकार येणार, अशी बतावणी भाजप करीत असल्याचाही आराेप जयंत पाटील यांनी केला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Patilनारायण पाटील