शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

माेबाइल कंपन्यांच्या मनमानीला महापालिकेची मूक संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST

अकोलेकरांना फोर-जी सुविधा देण्यासाठी शहरात विविध मोबाइल कंपन्यांकडून भूमिगत व ओव्हरहेड फायबर ऑप्टिक केबलचे जाळे टाकले जात आहे. काही ...

अकोलेकरांना फोर-जी सुविधा देण्यासाठी शहरात विविध मोबाइल कंपन्यांकडून भूमिगत व ओव्हरहेड फायबर ऑप्टिक केबलचे जाळे टाकले जात आहे. काही मोबाइल कंपन्यांनी मनपा प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता व रस्ते, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्यास त्याबदल्यात दुरुस्ती खर्च (रिस्टोरेशन चार्ज) जमा न करताच परस्पर अनधिकृतरीत्या फायबर ऑप्टिक केबलचे जाळे टाकल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला हाेता. काही कंपन्यांनी शहरातील इमारती, विद्युत खांबांवरून टाकलेले ‘ओव्हरहेड’ केबलचे जाळे काढून भूमिगत केबल टाकण्यासाठी प्रशासनाकडे अवधी मागितला होता. प्रशासनाचे दुर्लक्ष हाेताच मोबाइल कंपन्यांनी शहराचे विद्रूपीकरण करीत संपूर्ण शहरात ‘ओव्हरहेड’ केबलचे जाळे विणल्याची बाब समाेर आली आहे. या प्रकरणी विद्युत विभागाने केबल जप्तीची मोहीम राबवताच स्थानिक राजकारण्यांच्या दबावापाेटी ही कारवाई बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

तक्रारींचा पाठपुरावा नाहीच!

रस्त्यालगत किरकोळ साहित्याची विक्री करणाऱ्या लघू व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर मनपाकडून ताबडतोब कारवाई केली जाते. दुसरीकडे देशातील नामवंत मोबाइल कंपन्यांसमोर प्रशासन गुडघे टेकत असल्याचे दिसत आहे. ‘ओव्हरहेड’ केबल प्रकरणी मनपाच्या विद्युत विभागाने रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पुढे कोणती कारवाई झाली, याबाबत हा विभाग अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल; केबल टाकले

टाळेबंदीच्या कालावधीत मोबाइल टॉवरची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच काही तांत्रिक बिघाड झाल्यास देखभाल दुरुस्तीच्या सबबीखाली काही नामवंत मोबाइल कंपन्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळवली. या परवानगीच्या नावाखाली मनपा प्रशासनाने जप्त केलेल्या ओव्हरहेड केबलच्या ऐवजी नवीन केबल टाकण्यात आले. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केल्यावरही मनपा प्रशासनाने मोबाइल कंपन्यांवर कारवाई केली नाही, हे येथे उल्लेखनीय.