शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मूग-उडिदाचे उत्पादन बुडाले; रब्बी पेरणीचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 3:43 PM

पावसात खंड पडल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागत मूग व उडीद पिकाच्या पेरण्या उलटल्या होत्या.

अकोला: पाऊस सुरू होण्यास झालेला विलंब आणि त्यानंतर पावसात खंड पडल्याने, जिल्ह्यात मूग व उडीद पिकाच्या पेरण्या उलटल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मूग व उडिदाचे उत्पादन बुडाले. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर रब्बी पेरणीचा खर्च भागविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने मूग-उडीद उत्पादक शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी शासनाकडून मदत देण्याची मागणी होत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाला. रिमझिम पावसात खरीप पेरण्या झाल्यानंतर गत २३ जुलैपर्यंत पावसात खंड पडल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागत मूग व उडीद पिकाच्या पेरण्या उलटल्या होत्या. तसेच अनेक शेतकºयांना मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, पेरणीचा खर्चही वसूल झाला नसल्याने, जिल्ह्यातील मूग, उडीद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील पेरणी तोंडावर आली असून, रब्बी पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न आर्थिक अडचणीत सापडलेल्या मूग, उडीद उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने अडचणीत सापडलेल्या मूग व उडीद उत्पादक शेतकºयांना रब्बी पेरणीसाठी शासनामार्फत मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.पावसात खंड पडल्याने शेतकºयांना मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. मूग-उडीद पिकाचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी मूग व उडीद उत्पादक शेतकºयांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे.- मनोज तायडेशेतकरी जागर मंच, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी