किरकोळ वादातून खून : दोघांना अटक
By Admin | Updated: January 11, 2017 01:23 IST2017-01-11T01:23:16+5:302017-01-11T01:23:16+5:30
किरकोळ वादातून चौघांनी मिळून दोघा भावंडावर कुºहाड, चाकू आणि लोखंडी पाइपने हल्ला चढविला.

किरकोळ वादातून खून : दोघांना अटक
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 11 - किरकोळ वादातून चौघांनी मिळून दोघा भावंडावर कुºहाड, चाकू आणि लोखंडी पाइपने हल्ला चढविला. यात दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री पातूर रोडवरील सात मैल गावात घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा या प्रकरणात ओंकार चव्हाण व विक्रम चव्हाण या दोधांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.