शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे बाजार मंदावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:43 IST

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यात पिकांची परिस्थितीसुद्धा समाधानकारक नाही. कमी पावसामुळे तूर, हरभरा, सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे.खरीप हंगामात कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके अकोला जिल्ह्यात घेतली जातात. यासोबतच, केळी, संत्रा, भुईमूग, उसाचे पीकसुद्धा घेतले जाते. रब्बी हंगामात हरभरा, गहू इतर किरकोळ पिके घेतली जातात. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सर्व पिकांचे उत्पादन काही प्रमाणात का होईना, परंतु उत्पादनात घट झाली आहे.जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे. यंदा पिकांना साजेसा पाऊस न झाल्यामुळे मूग, तूर, हरभºयाचे उत्पादन बºयाच प्रमाणात कमी झाले आहे. दुष्काळाची झळ जिल्ह्यातील अनेक गावांना पोहोचली असल्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी हे कोरडवाहूच शेती करतात. सिंचनाची व्यवस्था असणाºया शेतकऱ्यांना मात्र उत्पादन चांगले झाले; परंतु कोरडवाहू शेतीला यंदा पावसाने दगा दिल्यामुळे उत्पादनावर त्याचा निश्चित परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून ऐकायला मिळाल्या. गतवर्षीसुद्धा दुष्काळाचा फटका जिल्ह्याला बसला होता; परंतु पीक परिस्थितीवर त्याचा एवढा परिणाम दिसून आला नाही. गतवर्षीत बाजार समित्यांमध्ये धान्याची चांगली आवक झाली होती. यंदा मात्र, तशी परिस्थिती दिसून येत नाही.सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये ३ ते ४ क्विंटल धान्याची आवक होत असल्यामुळे हमाल, मापारी, अडते, व्यापाºयांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास बाजार समिती परिसरात शुकशुकाट दिसून येतो. दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

यंदा पिके झाली नाहीत. सोयाबहन, तूर, हरभºयाचे पीक साधारण झाले. त्याचा परिणाम बाजार समितीमधील व्यवहारांवर दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा शेतमालाची आवक कमी झाली आहे.-शिरीष धोत्रे,सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोलागतवर्षीच्या तुलनेत तूर, हरभºयाची आवक कमी आहे. दररोज तीन ते चार क्विंटल धान्याची आवक आहे. दुष्काळ परिस्थितीचा परिणाम जाणवत आहे. बाजार समितीतील उलाढाल कमी झाली आहे.-सुनील मालोकार, सचिव, कृउबास, अकोलायंदा पीकपाणी चांगले झाले नाही. तूर, सोयाबीन, मूग पिकांचे उत्पादन घटल्याने आवक कमी आहे. दुष्काळाचा फारसा परिणाम दिसून येत नाही; परंतु मालाची आवक घटली आहे.- राजेश राठी,अडत दुकानदारयंदा नापिकी आहे. काही भागामध्ये दुष्काळ जाणवत आहे. पीक परिस्थिती समाधानकारक नाही. भाव-कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी समाधानी नाही.-विनोद हेरोळे, शेतकरी, पातूर नंदापूर

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोलाdroughtदुष्काळFarmerशेतकरी