शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

दुष्काळामुळे बाजार मंदावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:43 IST

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यात पिकांची परिस्थितीसुद्धा समाधानकारक नाही. कमी पावसामुळे तूर, हरभरा, सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे.खरीप हंगामात कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके अकोला जिल्ह्यात घेतली जातात. यासोबतच, केळी, संत्रा, भुईमूग, उसाचे पीकसुद्धा घेतले जाते. रब्बी हंगामात हरभरा, गहू इतर किरकोळ पिके घेतली जातात. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सर्व पिकांचे उत्पादन काही प्रमाणात का होईना, परंतु उत्पादनात घट झाली आहे.जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे. यंदा पिकांना साजेसा पाऊस न झाल्यामुळे मूग, तूर, हरभºयाचे उत्पादन बºयाच प्रमाणात कमी झाले आहे. दुष्काळाची झळ जिल्ह्यातील अनेक गावांना पोहोचली असल्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी हे कोरडवाहूच शेती करतात. सिंचनाची व्यवस्था असणाºया शेतकऱ्यांना मात्र उत्पादन चांगले झाले; परंतु कोरडवाहू शेतीला यंदा पावसाने दगा दिल्यामुळे उत्पादनावर त्याचा निश्चित परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून ऐकायला मिळाल्या. गतवर्षीसुद्धा दुष्काळाचा फटका जिल्ह्याला बसला होता; परंतु पीक परिस्थितीवर त्याचा एवढा परिणाम दिसून आला नाही. गतवर्षीत बाजार समित्यांमध्ये धान्याची चांगली आवक झाली होती. यंदा मात्र, तशी परिस्थिती दिसून येत नाही.सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये ३ ते ४ क्विंटल धान्याची आवक होत असल्यामुळे हमाल, मापारी, अडते, व्यापाºयांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास बाजार समिती परिसरात शुकशुकाट दिसून येतो. दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

यंदा पिके झाली नाहीत. सोयाबहन, तूर, हरभºयाचे पीक साधारण झाले. त्याचा परिणाम बाजार समितीमधील व्यवहारांवर दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा शेतमालाची आवक कमी झाली आहे.-शिरीष धोत्रे,सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोलागतवर्षीच्या तुलनेत तूर, हरभºयाची आवक कमी आहे. दररोज तीन ते चार क्विंटल धान्याची आवक आहे. दुष्काळ परिस्थितीचा परिणाम जाणवत आहे. बाजार समितीतील उलाढाल कमी झाली आहे.-सुनील मालोकार, सचिव, कृउबास, अकोलायंदा पीकपाणी चांगले झाले नाही. तूर, सोयाबीन, मूग पिकांचे उत्पादन घटल्याने आवक कमी आहे. दुष्काळाचा फारसा परिणाम दिसून येत नाही; परंतु मालाची आवक घटली आहे.- राजेश राठी,अडत दुकानदारयंदा नापिकी आहे. काही भागामध्ये दुष्काळ जाणवत आहे. पीक परिस्थिती समाधानकारक नाही. भाव-कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी समाधानी नाही.-विनोद हेरोळे, शेतकरी, पातूर नंदापूर

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोलाdroughtदुष्काळFarmerशेतकरी