शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्यात महाराष्ट्र दुसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 13:22 IST

अकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

- राजेश शेगोकारअकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. डिसेंबर २०१८ या अवघ्या एका महिन्यात कर्नाटकनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक वणवे लागले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कर्नाटकात एकूण ७७, महाराष्ट्रात ३४, अरुणाचल प्रदेश २७ तर नागालँड आणि आंध्र प्रदेशमध्ये अनुक्रमे २४ वनव्यांच्या घटना घडल्या आहेत.भारतीय वन सर्वेक्षण संस्था ही उपग्रहावरून जंगलातीलआगीच्या घटनांची नोंद घेते. त्यानुसार जीपीएसच्या आधारे प्रत्यक्ष वन क्षेत्रात जाऊन कर्मचारी तपासणी करतात. अशा आगींची माहिती सर्व राज्यांना माहिती दिली जाते त्याला ‘फॉरेस्ट अर्लट’ असे म्हणतात. २०१८ च्या डिसेंबर मध्ये कर्नाटकाच्या वनक्षेत्रात सर्वाधिक फॉरेस्ट अलर्ट प्राप्त झाले आहेत, तर महाराष्ट्र हे दुसऱ्या स्थानावर आहे. हे निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे आहेत. वन विभागाचा फायर सीझन डिसेंबरमध्ये सुरू होते आणि पहिल्याच महिन्यातील आकडेवारी चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, ताडोबा, नवेगाव या व्याघ्र प्रकल्पात तर टिपेश्वर, पैनगंगा, उमरेडसारख्या अभयारण्यात आगी लागल्याच्या घटना घडल्या असून महाराष्ट्रातील सर्व वणवे मानव निर्मित आहेत. त्यामुळे वनसंपदेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 वणव्यामुळे वाघ ते वाळवी अशी संपूर्ण अन्न साखळी धोक्यात येते. यात केवळ वन्य प्राणी व पक्षी यांनाच जीव गमवावा लागत नाहीत, तर साप, पाल, सरडे, मुंग्या या प्रकारच्या जीवांच्या मृत्यूचे प्रमाण मोजता येत आहे. वणवा हा वनांना एक मोठा धोका आहे. गवत जळल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची उपासमार होते. वाघाचे खाद्य धोक्यात येते. यासंदर्भात स्थानिक समुदायांना सुशिक्षित करावे लागेल, तसेच वणवा लागणार नाही, यासाठी अधिक प्रभावी उपयोजना करणे आवश्यक आहे.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाforestजंगलfireआग