शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शेती झाली तोट्याची; हमी भाव कमी, लागवडीचा खर्च जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 10:49 IST

Loss in agriculture ; प्रति एकर लागवडीचा खर्च हा हमीभावापेक्षा जास्त असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

- रवी दामोदर

अकोला: निसर्गचक्र बदलल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. अशातच यंदा कोरोनाचे संकट, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, वाढलेली महागाई यामुळे लागवडीचा खर्च हा हजारोंनी वाढला, तर त्या तुलनेत हमीभाव मात्र केवळ ७० रुपयांनी वाढल्याने शेती तोट्याची झाली आहे. प्रति एकर लागवडीचा खर्च हा हमीभावापेक्षा जास्त असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२१-२२ या वर्षासाठी हमीभाव जाहीर केले; केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार प्रति क्विंटल २० ते ४५२ रुपयांची वाढ झाली. त्यामध्ये जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये, कपाशीमध्ये २०० ते २१० रुपये इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १००० ते १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. निसर्गाचे चक्र बदलल्याने गतवर्षी अति पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा बियाणांचे दर वाढले आहेत. सोयाबीनच्या बियाणांच्या एका बॅगची किंमत चार हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. सरासरी विचार केल्यास एकरी एक बॅग बियाणे लागते. तसेच रासायनिक खतांचे वाढलेले भाव, गावरान खताच्या दरात वाढ झाली आहे. एवढा खर्च, परिश्रम घेऊनही निसर्गाचा समतोल बिघडल्याने पीक हाती येईल की नाही, याची शाश्वती नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

 

पीक             यंदाचा हमीभाव झालेली वाढ            

 

मूग                         ७२७५             ७९

उडीद                         ६३००             ३००

सोयाबीन             ३९५०             ७०

कपाशी (मध्यम धागा) ५७२६             २११

कपाशी (लांबधागा) ६०२५             २००

तूर                         ६३००             ३००

ज्वारी (हायब्रीड) २७३८             ११८

 गतवर्षीच्या तुलनेत १० हजार रुपयांनी वाढला खर्च

गेल्या वर्षी कापूस, तूर आणि सोयाबीनचा पेरा हा जिल्ह्यात सर्वाधिक होता. या पिकासाठी शेतकऱ्याला प्रति एकर जवळपास ३० हजार रुपये येतो; मात्र यंदा ट्रॅक्टरद्वारे शेती महागली, बियाणांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जवळपास १० हजार रुपयांनी वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

यंदा डिझेलचे दर वाढले, मजुरी महागली यामुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. तसेच वेळेवर पाऊस येत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. शेती न परवडणारी झाली असून, सरकारने हमीभावात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

हेमंत नागे, शेतकरी, पाचपिंपळ.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती