शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेती झाली तोट्याची; हमी भाव कमी, लागवडीचा खर्च जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 10:49 IST

Loss in agriculture ; प्रति एकर लागवडीचा खर्च हा हमीभावापेक्षा जास्त असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

- रवी दामोदर

अकोला: निसर्गचक्र बदलल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. अशातच यंदा कोरोनाचे संकट, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, वाढलेली महागाई यामुळे लागवडीचा खर्च हा हजारोंनी वाढला, तर त्या तुलनेत हमीभाव मात्र केवळ ७० रुपयांनी वाढल्याने शेती तोट्याची झाली आहे. प्रति एकर लागवडीचा खर्च हा हमीभावापेक्षा जास्त असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२१-२२ या वर्षासाठी हमीभाव जाहीर केले; केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार प्रति क्विंटल २० ते ४५२ रुपयांची वाढ झाली. त्यामध्ये जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये, कपाशीमध्ये २०० ते २१० रुपये इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १००० ते १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. निसर्गाचे चक्र बदलल्याने गतवर्षी अति पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा बियाणांचे दर वाढले आहेत. सोयाबीनच्या बियाणांच्या एका बॅगची किंमत चार हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. सरासरी विचार केल्यास एकरी एक बॅग बियाणे लागते. तसेच रासायनिक खतांचे वाढलेले भाव, गावरान खताच्या दरात वाढ झाली आहे. एवढा खर्च, परिश्रम घेऊनही निसर्गाचा समतोल बिघडल्याने पीक हाती येईल की नाही, याची शाश्वती नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

 

पीक             यंदाचा हमीभाव झालेली वाढ            

 

मूग                         ७२७५             ७९

उडीद                         ६३००             ३००

सोयाबीन             ३९५०             ७०

कपाशी (मध्यम धागा) ५७२६             २११

कपाशी (लांबधागा) ६०२५             २००

तूर                         ६३००             ३००

ज्वारी (हायब्रीड) २७३८             ११८

 गतवर्षीच्या तुलनेत १० हजार रुपयांनी वाढला खर्च

गेल्या वर्षी कापूस, तूर आणि सोयाबीनचा पेरा हा जिल्ह्यात सर्वाधिक होता. या पिकासाठी शेतकऱ्याला प्रति एकर जवळपास ३० हजार रुपये येतो; मात्र यंदा ट्रॅक्टरद्वारे शेती महागली, बियाणांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जवळपास १० हजार रुपयांनी वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

यंदा डिझेलचे दर वाढले, मजुरी महागली यामुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. तसेच वेळेवर पाऊस येत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. शेती न परवडणारी झाली असून, सरकारने हमीभावात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

हेमंत नागे, शेतकरी, पाचपिंपळ.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती