शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

Lok Sabha Election 2019 : तेच उमेदवार, तोच गेम प्लॅन फक्त ‘वंचित’चा तडका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:33 IST

विक्रम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जुनेच उमेदवार रिंगणात उतरविले असून, विजयासाठीचा गेम प्लॅनही जुनाच आहे

- राजेश शेगोकारअकोला: पश्चिम वºहाडातील अकोला लोकसभा मतदारसंघ सध्या नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा असल्याने तो राज्यात लक्षवेधी ठरला आहे. भाजपाने सलग चार वेळा हा मतदारसंघ जिंकलेला नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसला सोडून जिंकलेले नाही अन् काँग्रेसने आंबेडकरांची कोंडी करून विजय मिळविलेला नाही, त्यामुळे या निवडणुकीत कोणाचाही विजय झाला तर तो विक्रम ठरणार आहे. हा विक्रम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जुनेच उमेदवार रिंगणात उतरविले असून, विजयासाठीचा गेम प्लॅनही जुनाच आहे. फक्त गेल्यावेळी असलेल्या भारिप-बमसंला अधिक विस्तारित करीत ‘वंचित बहुजन आघाडी’ या नावाचा तडका तेवढा नवा आहे. मंगळवार अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल झालेल्या अर्जावरून २०१४ च्याच निवडणुकीमधील तिरंगी लढत नव्याने होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.गत १५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यापूर्वी १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये भाजपाचे स्व. पांडुरंग फुंडकर सतत तीनदा या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. फुंडकर आणि धोत्रे यांनी या मतदारसंघात विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली असली, तरी सलग चौथा विजय फुंडकरांना मिळविता आला नाही. भाजपाला हादरा देण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती. त्या बळावर १९९८ व १९९९ मध्ये मिळालेले यश पुन्हा एकदा मिळविता येईल, अशी काँग्रेसला आशा होती; मात्र आघाडी फिस्कटल्याने अ‍ॅड. आंबेडकर आणि काँग्रेस स्वतंत्रपणे आता रिंगणात उतरले आहेत.खरे तर राजकारण हे प्रवाही असते. ते स्थिर नसते. त्यामुळे वरवर पाहता २०१९ ची लढाई ही २०१४ सारखीच आहे, असे दिसत असले तरी अनेक मूलभूत बदल झालेले आहेत. भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी मतदारसंघावरील आपली पकड थोडीही सैल केलेली नाही. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचे स्वतंत्र ‘नेटवर्क’ आहे. भाजपामध्ये अंतर्गत वाद प्रचंड असला तरी त्याचा पक्षाच्या कामगिरीवर फरक पडला नसल्याचे महापालिका निवडणुकीचे निकाल दर्शवितात; मात्र २०१४ साली असलेली मोदी लाट आता नाही, त्यामुळे भाजपाला विकासाचा मुद्दा घेऊन सामोरे जावे लागेल. भाजपाकडे पाचपैकी चार आमदार असल्यामुळे या मुद्यावर भाजपा वरचढ ठरत असली तरी अर्धवट असलेली विकास कामे अन् रखडलेले प्रश्न याविषयी लोकांमध्ये असलेला सुप्त रोष वाढणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यावीच लागणार आहे. नेमक्या याच मुद्याचे भांडवल करीत काँग्रेस अन् वंचित बहुजन आघाडीला आपली रेष मोठी करावी लागणार आहे. काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा रिंगणात उतरविले आहे. त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पक्षातूनही पाहिजे तेवढा उत्साह व्यक्त झाला नाही. याची कारणे वेगळी असली तरी पटेल यांची उमेदवारी एकदमच कमजोर नाही. दोन वेळा खासदार राहिलेले धोत्रे व राष्टÑीय वलय प्राप्त असलेल्या अ‍ॅड. आंबेडकर यांना गेल्यावेळी टक्कर देताना त्यांनी क्रमांक दोनची मते घेतली होती. त्यांना मिळालेली मते ही सरसकट मुस्लीम समाजाचीच होती, असे गृहीत मांडणे धाडसाचे ठरेल.

मोदी लाटेतही काँग्रेसने टिकवून ठेवलेली ती व्होट बँक होती. त्यामुळे यावेळी या व्होट बँकेत किती मतांची भर ते टाकू शकतात, यावरच त्यांच्या लढतीची तीव्रता ठरणार आहे. काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी घातलेला घोळ, पक्षांतर्गत असलेले गटबाजीचे वातावरण, मतभेदांनी वेढलेल्या राष्टÑवादी काँग्रेसची साथ अशा आव्हानांना पेलत पटेल यांना धोत्रे अन् आंबेडकर या दोन्ही मातब्बरांशी सामना करावा लागणार आहे. केवळ अ‍ॅड. आंबेडकरांची कोंडी करण्याच्याच भूमिकेत ते लढले तर काँग्रेसची व्होट बँक हातची जाऊ शकते, त्यामुळे ते कोणती रणनीती आखतात, यावरही त्यांचे अन् काँग्रेसचेही भविष्य अवलंबून आहे. या दोन उमेदवारांव्यतिरिक्त उभ्या महाराष्टÑाचे लक्ष अ‍ॅड. आंबेडकरांच्या रणनीतीकडे लागले आहे. लागोपाठ तीनदा पराभव पत्करल्यानंतर १९९८ व १९९९ च्या निवडणुकांमध्ये मिळालेला विजय ते पुन्हा मिळवू शकले नाहीत. या पृष्ठभूमीवर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा आशावाद अतिशय प्रबळ असा आहे. दलित, ओबीसी, मुस्लीम, आदिवासी अशा वंचितांचा जागर करीत त्यांनी भारिप-बमसंला थेट वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्याचे मोठे धाडसी पाऊल उचलले आहे. या नव्या नावामुळे परंपरागत मतांमध्ये भर पडेल, असा त्यांचा कयास आहे. तो खरा ठरला अन् काँग्रेसने केलेली कोंडी ते फोडू शकले, तर मागील मतांच्या तुलनेत त्यांची उडी किती उंच जाते, यावरच त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरणार आहे. या तीन प्रमुख उमेदवारांवरच निवडणुकीचे रिंगण फिरणार आहे. जुनेच खेळाडू असल्यामुळे एकमेकांना एकमेकांची शक्तिस्थळे आणि कमकुवत दुवे माहिती आहेत. यावेळी आता नव्याने कोणती रणनीती आखून प्रत्येक उमेदवार आपली रेष कशी मोठी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Dhotreसंजय धोत्रे