शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

स्वस्त धान्य लाभार्थींच्या यादीत महापौरांसह प्रतिष्ठितांची नावे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:49 IST

अकोला : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य गटातील धान्य लाभार्थी समाविष्ट करण्यासाठी पुरवठा विभागाकडे असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांमध्ये चक्क महापौर विजय अग्रवाल, माजी नगरसेविका तसेच काँग्रेसच्या नेत्या सुष्मा निचळ यांचीही नावे असल्याने लाभार्थींची निवड कशी करावी, या पेचात स्वस्त धान्य दुकानदार आहेत. दूसरीकडे संधीचे सोने करत अनेक दुकानदारांनी हवी ती नावे घुसडण्याचा प्रकारही सुरू केल्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातून मंजुरी दिली जात आहे.

ठळक मुद्देदुकानदारांकडून निवड दुचाकी, चारचाकी, मोबाइल नसणारे लाभार्थी

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य गटातील धान्य लाभार्थी समाविष्ट करण्यासाठी पुरवठा विभागाकडे असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांमध्ये चक्क महापौर विजय अग्रवाल, माजी नगरसेविका तसेच काँग्रेसच्या नेत्या सुष्मा निचळ यांचीही नावे असल्याने लाभार्थींची निवड कशी करावी, या पेचात स्वस्त धान्य दुकानदार आहेत. दूसरीकडे संधीचे सोने करत अनेक दुकानदारांनी हवी ती नावे घुसडण्याचा प्रकारही सुरू केल्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातून मंजुरी दिली जात आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २0१३ ची राज्यात १ फेब्रुवारी २0१४ पासून अंमलबजावणी सुरू झाली. त्यावेळी ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागातील ४५.३४ टक्के लाभार्थी संख्येला अन्नसुरक्षेचे कवच देण्यात आले. शासनाने १७ डिसेंबर २0१३ रोजीच ही संख्या निश्‍चित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात शिधापत्रिका रद्द झाल्या.  पुन्हा पात्र लाभार्थींची संख्या १३ ऑक्टोबर २0१६ रोजीच्या निर्णयाने बदलण्यात आली. त्यानुसार बदललेल्या लाभार्थी संख्येचा सर्वाधिक फटका अकोला जिल्हय़ाला बसला. त्यावेळी जिल्ह्यात प्राधान्य गटातील २३४८९ शिधापत्रिकामध्ये असलेल्या ११७३४६ लाभार्थींना धान्य सुरू ठेवण्यात आले, तर ४७,१७२ केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील २ लाख २९१२१ लाभार्थी वंचित ठेवण्यात आले.  त्या लाभार्थी कुटुंबाच्या ३६८३0 शिधापत्रिकांना प्राधान्य गटात समाविष्ट केले जात आहे. त्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ व इतर धान्य मिळणार आहे. 

आर्थिक व्यवहारातून लाभार्थी निवडीची संधीलाभार्थींचे स्वयंघोषणापत्र पाहून त्याला धान्य वाटप सुरू केले जाते. त्यासाठी दिलेल्या घोषणापत्रात उत्पन्न ५९ हजारापेक्षा कमी असणे, पक्के घर नसणे, दुचाकी, चारचाकी, महागडा मोबाइल नाही, असा मजकूर आहे. त्यावर लाभार्थी आणि दुकानदाराची स्वाक्षरी एवढय़ावरच निवड केली जात आहे. त्यामध्ये ज्यांना धान्याची गरज नाही, त्यांची बनावट स्वाक्षरी करून धान्य लाटण्याची संधी दुकानदारांना निर्माण झाली आहे. सोबतच मर्जीतील लाभार्थीही निवडता येतात. या सगळ्य़ा प्रकारामुळे काही दुकानदारांनी संधीचे सोने करणे सुरू केले आहे. त्यासाठी काहींनी आर्थिक व्यवहारही सुरू केल्याची माहिती आहे.

अन्नसुरक्षा कवचापासून वर्षभर वंचितअकोला शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने धान्य वाटपासाठी पात्र लाभार्थी निवडीला प्रचंड विलंब केला आहे. त्यामुळे शहरातील ३६ हजारापेक्षाही अधिक कुटुंबांना कायद्यानुसार अन्नसुरक्षेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

स्वयंघोषणापत्राच्या पडताळणीविनाच मंजुरीलाभार्थी निवड करण्यासाठी केशरी शिधापत्रिकाधारकांच्या याद्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे सोपवण्यात आल्या. निवड केलेल्या लाभार्थीची स्वयंघोषणापत्रावर स्वाक्षरी घेऊन दुकानदार शहर अन्न धान्य वितरण अधिकार्‍यांची मंजुरी घेत आहेत. ती मंजुरी मिळाली की, त्या लाभार्थींच्या नावे धान्य वाटप सुरू होत आहे.

दुकानदार, अधिकार्‍यांचीही दिरंगाईविशेष म्हणजे, अन्नसुरक्षा कायद्यानुसार लाभार्थी निवड करण्यासाठी शासनाने १३ ऑक्टोबर २0१६ रोजीच निर्देश दिले होते. त्यानुसार शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने २४ नोव्हेंबर २0१६ रोजीच पत्रातून दुकानदारांना त्याबाबत कळवले. त्यानंतर अद्यापही ही निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. पुरवठा अधिकारी, दुकानदारांच्या दिरंगाईचा फटका अकोला शहरातील दोन लाख लाभार्थींना बसत आहे. कायद्यानुसार हा प्रकार दंडास पात्र आहे. 

माझ्या कुटुंबाकडे कोणती शिधापत्रिका आहे, हे माहिती नाही. केशरी शिधापत्रिकाधारकांतून निवड होत असताना त्यामध्ये कुटुंबाचा समावेश होऊन मिळणारे धान्य घेण्याचे कारण नाही. आपण आयकर भरत आहो, त्यामुळे या लाभासाठी निवड करू नये, असे पत्र पुरवठा विभागाला दिले जाईल. - विजय अग्रवाल, महापौर महापालिका. 

पात्र लाभार्थींची यादी दुकानात लावली जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांकडून धान्य दुकानदारांनी दिलेल्या स्वयंघोषणापत्रातील माहिती चुकीची असल्याच्या तक्रारी झाल्यास लाभार्थी अपात्र केला जाईल. - रमेश पवार, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी, अकोला.

शहरातील लाभार्थींनी दुकानदारांकडे जाऊन कोणाला पात्र ठरवले जात आहे, याची माहिती घ्यावी, स्वत:चे कुटुंब पात्र ठरत असल्यास दुकानदारांकडून प्रस्ताव द्यावे, अपात्र नावे निदर्शनास आणून द्यावी. - संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.