शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

यंदाही खरीप उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 6:33 PM

पाऊस सुरू असल्याने शेते शेवाळली असूून, पिकांना प्रकाशसंश्लेषणही होत नसल्याने पिके पिवळी आहेत.

अकोला: विदर्भात सतत तुरळक पाऊस सुरू असल्याने शेते शेवाळली असूून, पिकांना प्रकाशसंश्लेषणही होत नसल्याने पिके पिवळी आहेत. परिणामी यावर्षीही उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात ५० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली असून, सर्वाधिक जास्त कापूस व सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर पुन्हा चार आठवडे पावसाचा खंड पडल्याने हजारो हेक्टरवरील पिके हातची गेली. शेतकऱ्यांना त्यावर नांगर फिरवावा लागला. २६ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तथापि, हा पाऊस दमदार नसला तरी सतत तुरळक स्वरू पाचा पडत असून, कायम ढगाळ वातावरण असल्याने पिकांना प्रकाशसंश्लेषण होत नसून, श्ोतात बुरशी निर्माण झाली. परिणामी पिके पिवळी पडली आहेत. सध्या सोयाबीन पीक फुलोºयावर येण्याच्या अवस्थेत आहे. तथापि, या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यावर परिणाम होताना दिसत आहे. कापूस पिकांची स्थिती हीच आहे. इतर पिके पिवळी पडली आहेत. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, सोयाबीनवर प्रचंड कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसोशोषण करणाºया किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, आत्यांतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे; परंतु प्रतिकूल वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

सतत पाऊस सुरू असल्याने जमीन शेवाळली असून, पिकांच्या मुळांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. या सर्व परिस्थितीचा पिकांवर परिणाम होत असला तरी शेतकºयांनी घाबरू न न जाता कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पिकांचे व्यवस्थापन करावे. - डॉ.जे.पी. देशमुख,ज्येष्ठ शास्त्रज्ञ,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ