शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
4
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
5
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
6
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
7
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
8
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
9
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
10
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
11
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
12
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
13
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
14
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
15
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
16
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
17
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
18
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
19
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
20
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

संवाद अन् सकारात्मक विचारातून राखा मानसिक आरोग्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 10:32 IST

World Mental health Day कोरोनाचा हा काळ परीक्षेचा असून, प्रत्येकाने सावधगिरीने वाटचाल करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाकाळात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच ताणतणाव वाढला असून, अनेक जण नैराश्येच्या गर्तेत खेचल्या गेले आहेत. शिवाय, कोरोनाविषयी असलेल्या विविध गैरसमजांमुळे अनेकांमध्ये फोबियाचेही लक्षणं दिसू लागली आहेत. अशा परिस्थितीत कौटुंबिक संवाद अन् सकारात्मक विचार यातूनच मानसिक आरोग्य राखणे शक्य आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.कोरोना काळातील चार महिने जवळपास सर्वच व्यवहार ठप्प होते. परिणामी, अनेक जण बेरोजगार झाले. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे पर्यायी साधनंही नसल्याने चिंता वाढली. कुटुंबातील सर्व सदस्य एकाच छताखाली असूनही मोबाइल अन् सोशल मीडियामुळे एकमेकांपासून दूर गेले. त्यामुळे एकटेपणा वाढून चिमुकल्यांसह वयोवृद्धांमध्येही चिडचिड अन् बेचैनीचे वातावरण पसरले. त्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ लागले असून, अनेकांमध्ये नैराश्य, फोबिया, चिंता यासारख्या मानसिक आजाराची लक्षणं आढळून येत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा हा काळ परीक्षेचा असून, प्रत्येकाने सावधगिरीने वाटचाल करण्याची गरज आहे, तसेच मानसिक आरोग्य राखण्यासाठी नागरिकांनी कौटुंबिक संवाद वाढवून सकारात्मक विचार सरणीचा अवलंब करावा, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी दिले आहे.हे करा

  • योग, व्यायाम करा.
  • कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधा.
  • लहान मुलांसोबत वेळ घालवा.
  • नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांकडे लक्ष केंद्रित करा.
  • नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा.
  • पुस्तक वाचा.

 

या समस्या येत आहेत समोरकोरोना काळात अनेकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहेच, शिवाय काही रुग्णांमध्ये मेंदु विकार असल्याचेही आढळून आले आहे. ही सुरुवात असून, आणखी काही मानसिक समस्या समोर येण्याची शक्यता असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.कोरोनाचा सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्यामुळे मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य अन् त्यातून होणारी चिडचिड याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे; मात्र हा परीक्षेचा काळ असून, प्रत्येकाने सावधगिरीने यातून पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने कौटुंबिक संवाद वाढविणे आवश्यक असून, सकारात्मक विचारसरणीतून पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.- डॉ. अनुप राठी,मानसोपचार तज्ज्ञ, अकोला.तणावमुक्तीसाठी हे करताहेत डॉक्टर्स

साधारणत: २४ वर्षांखालील व्यक्तींना मानसिक थकवा जाणवतो. यातील ५० टक्के मानसिक थकवा हा १४ वर्षाखालील मुलांना होतो. मुलांमध्ये नैराश्य, कुठल्याही गोष्टीत उत्साह नसणे, एखाद्या गोष्टीविषयी फार जास्त भीती वाटणे किंवा अभ्यासात मागे पडणे, एकटेपणात जास्त वेळ घालवणे, अशी लक्षणे आढळताच पालकांनी मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.- डॉ. नरेंद्र राठी, बालरोग तज्ज्ञ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMental Health Tipsमानसिक आरोग्य