शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संवाद अन् सकारात्मक विचारातून राखा मानसिक आरोग्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 10:32 IST

World Mental health Day कोरोनाचा हा काळ परीक्षेचा असून, प्रत्येकाने सावधगिरीने वाटचाल करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाकाळात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच ताणतणाव वाढला असून, अनेक जण नैराश्येच्या गर्तेत खेचल्या गेले आहेत. शिवाय, कोरोनाविषयी असलेल्या विविध गैरसमजांमुळे अनेकांमध्ये फोबियाचेही लक्षणं दिसू लागली आहेत. अशा परिस्थितीत कौटुंबिक संवाद अन् सकारात्मक विचार यातूनच मानसिक आरोग्य राखणे शक्य आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.कोरोना काळातील चार महिने जवळपास सर्वच व्यवहार ठप्प होते. परिणामी, अनेक जण बेरोजगार झाले. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे पर्यायी साधनंही नसल्याने चिंता वाढली. कुटुंबातील सर्व सदस्य एकाच छताखाली असूनही मोबाइल अन् सोशल मीडियामुळे एकमेकांपासून दूर गेले. त्यामुळे एकटेपणा वाढून चिमुकल्यांसह वयोवृद्धांमध्येही चिडचिड अन् बेचैनीचे वातावरण पसरले. त्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ लागले असून, अनेकांमध्ये नैराश्य, फोबिया, चिंता यासारख्या मानसिक आजाराची लक्षणं आढळून येत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा हा काळ परीक्षेचा असून, प्रत्येकाने सावधगिरीने वाटचाल करण्याची गरज आहे, तसेच मानसिक आरोग्य राखण्यासाठी नागरिकांनी कौटुंबिक संवाद वाढवून सकारात्मक विचार सरणीचा अवलंब करावा, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी दिले आहे.हे करा

  • योग, व्यायाम करा.
  • कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधा.
  • लहान मुलांसोबत वेळ घालवा.
  • नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांकडे लक्ष केंद्रित करा.
  • नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा.
  • पुस्तक वाचा.

 

या समस्या येत आहेत समोरकोरोना काळात अनेकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहेच, शिवाय काही रुग्णांमध्ये मेंदु विकार असल्याचेही आढळून आले आहे. ही सुरुवात असून, आणखी काही मानसिक समस्या समोर येण्याची शक्यता असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.कोरोनाचा सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्यामुळे मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य अन् त्यातून होणारी चिडचिड याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे; मात्र हा परीक्षेचा काळ असून, प्रत्येकाने सावधगिरीने यातून पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने कौटुंबिक संवाद वाढविणे आवश्यक असून, सकारात्मक विचारसरणीतून पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.- डॉ. अनुप राठी,मानसोपचार तज्ज्ञ, अकोला.तणावमुक्तीसाठी हे करताहेत डॉक्टर्स

साधारणत: २४ वर्षांखालील व्यक्तींना मानसिक थकवा जाणवतो. यातील ५० टक्के मानसिक थकवा हा १४ वर्षाखालील मुलांना होतो. मुलांमध्ये नैराश्य, कुठल्याही गोष्टीत उत्साह नसणे, एखाद्या गोष्टीविषयी फार जास्त भीती वाटणे किंवा अभ्यासात मागे पडणे, एकटेपणात जास्त वेळ घालवणे, अशी लक्षणे आढळताच पालकांनी मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.- डॉ. नरेंद्र राठी, बालरोग तज्ज्ञ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMental Health Tipsमानसिक आरोग्य