शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अल्प पावसाच्या प्रदेशात मशरूम शेतीचा प्रेरणादायी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:35 IST

यशकथा : स्वत:ची कंपनी स्थापन करून मशरूमपासून बनणारी वेगवेगळी उत्पादने तयार करण्याचा मानस विलास कुमटे यांनी व्यक्त केला. 

- प्रशांत विखे (तेल्हारा, जि.अकोला) 

अल्प पाऊस आणि रोगराईच्या आक्रमणामुळे शेती परवडत नसल्याचे चित्र सध्या तेल्हारा तालुक्यात आहे. अशात शेतीला मशरूमच्या व्यवसायाची जोड देऊन विलास कुमटे या शेतकऱ्याने आर्थिक प्रगती साधली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विलास कुमटे मशरूम शेतीचा प्रयोग करून प्रेरणादायी ठरला आहे. व्यवसायात तेजी आल्याने मशरूमचे उत्पन्न वाढवून स्वत:ची कंपनी स्थापन करून मशरूमपासून बनणारी वेगवेगळी उत्पादने तयार करण्याचा मानस विलास कुमटे यांनी व्यक्त केला. 

विलास कुमटे यांच्याकडे जेमतेम ५ एकर शेती. त्यात दुष्काळ असल्याने घरची जेमतेम परिस्थिती; यामुळे त्यांना शेतीसोबत काय जोडधंदा करावा असा प्रश्न पडला होता. मशरूम लागवडीबाबत त्यांनी ऐकले होते, परंतु याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन त्यांना मिळत नव्हते, मित्राकडून मशरूमच्या शेतीबद्दल त्यांना माहिती मिळाली; पण ती परिपूर्ण नसल्याने एका कृषीच्या जाणकाराने त्यांना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये मशरूम लागवडीबाबत प्रशिक्षण दिले जाते याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली. नंतर स्वत: तेथे राहून मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेतले.

सोबतच त्यांनी पत्नीलाही प्रशिक्षण दिले. त्यानंतर शेतातील सोयाबीनचे कुटार जमा करून घरातच मशरूम लागवडीचा प्रयोग सुरू केला. त्यात यश मिळाले म्हणून स्वत: त्याचे मार्केटिंग करून फ्रेश मशरूम, वाळलेले मशरूम, मशरूम पावडर याची विक्री सुरू केली.  अत्यंत कमी खर्चामध्ये ३०० रुपयांच्या मशरूम बोन्समध्ये १२ हजार रुपयांचे उत्पन्न ४५ दिवसांत मिळत असल्याने बेडमध्ये होणाऱ्या मशरूमची विलासने संख्या वाढविली. आज विलासने ८० ते १०० बेडची व्यवस्था केली असून, कुटुंबातील पत्नी, मुलगा, हे या कामाला सहकार्य करीत आहेत. 

विलास स्वत: याची मार्केटिंग करून विक्री करीत आहे. शेतीला हा जोडधंदा असल्याने विलास यांना व्यवसाय वाढवायचा आहे. त्याकरिता मोठे टिनशेड व वातानुकूलित यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, भांडवल नसल्याने घरातच फाऱ्या व बोंदऱ्या लावून त्यावर पाणी फवारून २५ डिग्री से. तापमान मेन्टेन करीत आहे. दीड महिन्यात ४० हजार रुपयांचे उत्पन्न मशरूमच्या माध्यमातून विलास घेत आहे.

विलास केवळ मशरूम उत्पादनावरच समाधान मानणार नसून कर्जाच्या माध्यमातून आर्थिक भांडवल उभारून स्वत:ची कंपनी टाकण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. या माध्यमातून मशरूमपासून पावडर, वड्या, पापड, सूप हे उत्पादन तयार करून सरळ उत्पादन ते विक्री स्वत: करणार आहे. त्यामुळे खरोखरच विलासचा हा रोजगार इतर शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी आहे. याकरिता कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील कृषी अधिकारी ज्योती बोबडे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे, कृषी सहायक बोचरे, आत्मा समितीचे नेमाडे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्यानेच हे शक्य झाले, असे विलास कुमटे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी