शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

इंदिरा गांधींनी युद्ध जिंकले पण; सैनिकांच्या शौर्याचे श्रेय कधी घेतले नाही : शरद पवारांचा मोदींना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 14:12 IST

नरेंद्र मोदी मात्र सैनिकांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

वाडेगाव (अकोला) : सैनिकांच्या शौर्याचा वापर आजवर कोणत्याही सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी केला नव्हता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकून दाखविले; पण त्याचे श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. नरेंद्र मोदी मात्र सैनिकांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी वाडेगाव येथे लगावला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या बाळापूर मतदारसंघाच्या उमेदवारासाठी वाडेगाव येथे आयोजित जाहीर सभेत शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. केंद्रातील मोदी सरकार देशाच्या संरक्षणाच्या मुद्याचा राजकीय स्वार्थासाठी कसा वापर करत आहेत, याची पोलखोल करताना शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे ‘घर में घुस के मारेंगे’ची भाषा करतात. मोदी हे स्वत: दिल्लीत बसून शत्रूला मारणार आहेत का, असा सवाल करत पवार यांनी मोदींची खिल्ली उडविली. देशापुढील मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या सरकारला शेतकऱ्यांप्रती कोणतीही आस्था नाही. दिलेला शब्द न पाळणारे हे सरकार असून, शेतकरी व सामान्य मानसांच्या व्यथा या सरकारने कधी समजूनच घेतल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकांवर असताना, हमीभाव व शेतकºयांविषयी कळवळ्याने बोलायचे. आता सत्तेत असताना हा कळवळा कुठे गेला असा सवालही यावेळी पवारांनी केला. या सरकारने दिलेले कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत राज्यातील ६१ टक्के शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नसल्याचेही यावेळी शरद पवार म्हणाले.मी अजूनही तरुणच!शरद पवार यांच्यावर उतरत्या वयातही प्रचारसभा घेण्याची वेळ आली आहे, असा अपप्रचार विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतु, मी अजुनही तरुण आहे. म्हातारा झालेलो नाही. आधी भाजपला घालवेल मगच मी जाईल, असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAkolaअकोलाNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019