शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे अकाेल्यात काँग्रेसमध्ये बदलाच्या आशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:48 IST

Congress State President News काँग्रेसने प्रदेशस्तरावर नव्या दमाचे नेतृत्व दिले असून, प्रदेश कार्यकारिणीतही सत्तेचे विकेंद्रीकरण केले आहे.

अकोला : भाकरी का करपली, पाने का सडली, घोडा का अडला, या सर्व प्रश्नांना उत्तर एकच ते म्हणजे न फिरविल्याने. या लहानशा बोधकथेतून बोध घेत अनेकदा राजकीय पक्ष नेतृत्वाची भाकरी फिरवितात. मात्र, ती भाकरी फिरविणे म्हणजे जुन्याचे नवे करणे किंवा ताटातले वाटीत अन् वाटीतले ताटात करणे असेच असते. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये साधारणपणे असेच चित्र अनेकदा दिसून आले आहे. यावेळी मात्र नाना पटाेले यांच्या रूपाने काँग्रेसने प्रदेशस्तरावर नव्या दमाचे नेतृत्व दिले असून, प्रदेश कार्यकारिणीतही सत्तेचे विकेंद्रीकरण केले आहे. त्यामुळे अकाेल्यातील काँग्रेसजनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्या लाेकसभा निवडणुकीपूर्वीपासून अकाेला जिल्हा व महानगर काँग्रेसच्या कार्यकारिणीत बदल हाेणार आहेत, अशा वावड्या उठत हाेत्या. मात्र, काँग्रेसने कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये मरगळ आल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत प्रचंड उत्साह निर्माण झाला हाेता. मात्र, अल्पावधीतच काँग्रेसचा उत्साह मावळलेला दिसला. राष्ट्रवादीला अमाेल मिटकरी यांच्या रूपाने आमदार मिळाला, तर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमकपणे सत्तेचे फायदे मतदारसंघासाठी पाेहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला. यामध्ये काँग्रेस खूपच मागे राहिल्याचे दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या संमतीने जिल्हास्तरावर केल्या जाणाऱ्या शासकीय व निमशासकीय समित्यांचेही वाटप झालेले नसल्याने काँग्रेसच्या सामान्य पदाधिकाऱ्यांपर्यंत सत्तेचा वाटा आला नाहीच. दुसरीकडे पक्षाकडून आलेले कार्यक्रम व आंदाेलनापलीकडे अकाेल्यातील काँग्रेसने आपले अस्तित्व दर्शविले नाही. त्यामुळेच जिल्हा व महानगर काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याची मागणी अनेक नेत्यांनी प्रदेश कार्यकारिणीपर्यंत पाेहोचविली आहे. मात्र, प्रदेशस्तरावरच अस्थिरता असल्याने या मागणीची दखल घेतली गेली नाही. आता नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त झाले आहेत. त्यांना अकाेल्यातील राजकारणाची जाण आहे. विशेष म्हणजे भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम अकाेल्यातच झाला हाेता, तसेच यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील आंदाेलनातही नाना पटाेले सक्रिय हाेते. त्यामुळे नव्या बदलाची काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पक्षात जिल्हाध्यक्षपदासाठी अविनाश देशमुख, प्रकाश तायडे, अशोक अमानकर, प्रशांत गावंडे, डॉ. अभय पाटील, डॉ. पुरुषोत्तम दातकर, डॉ. सुधीर ढोणे, हेमंत देशमुख यांची नावे शर्यतीत आहेत, तर महानगर अध्यक्षपदासाठी प्रदीप वखारिया, नितीन ताकवाले, साजीद खान पठाण, कपिल रावदेव, अविनाश देशमुख, डाॅ. जिशान हुसेन यांच्या नावांची चर्चा आहे.

शेतकरी आंदाेलनात काँग्रेसचे नेते सक्रिय

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातही शेतकऱ्यांना जागृत करून आंदाेलन उभारण्यात काँग्रेसचे नेते सक्रिय राहिले. या नेत्यांनी शेतकरी जागर मंच, किसान विकास मंचच्या माध्यमातून अधिक सक्रिय लढा दिल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांना साेबत घेऊन चालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने दिसून आला. किसान विकास मंचने, तर थेट दिल्लीपर्यंत धडक दिली. त्यामुळे काँग्रेसमधील फेरबदल झाल्यास पक्षातील मरगळ दूर हाेण्याचे संकेतही अशा आंदाेलनातून समाेर आले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले