शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘डेंग्यू’ वर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश

By atul.jaiswal | Updated: May 16, 2018 13:46 IST

अकोला : कीटकजन्य आजारांपैकी सर्वाधिक गंभीर असलेल्या डेंग्यू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे.

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये गत दोन वर्षांपासून डेंग्यूचा कोणताही उद्रेक झाला नाही. यावर्षी आतापर्यंत केवळ ११ रुग्णांना डेंग्यू हा आजार झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने अकोला विभागात डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे.

अकोला : कीटकजन्य आजारांपैकी सर्वाधिक गंभीर असलेल्या डेंग्यू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. आरोग्य सेवा (हिवताप) अकोला मंडळांतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये गत दोन वर्षांपासून डेंग्यूचा कोणताही उद्रेक झाला नसून, यावर्षी आतापर्यंत केवळ ११ रुग्णांना डेंग्यू हा आजार झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.डेंग्यू या आजाराचा प्रसार ‘एडीस’डासाच्या मादीपासून होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे, साठविलेल्या पाण्यात या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. डेंग्यूची लागन झालेल्या रुग्णाला तीव्र स्वरूपाचा ताप येऊन रक्तातील प्लेटलेटस् कमी होतात. त्यामुळे अनेकदा हा आजार जीवघेणा सिद्ध होतो. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अकोला विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी केली जात आहे. अकोला विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वर्ष २०१६ मध्ये डेंग्यू आजाराचा एकही उद्रेक झाला नसून, डेंग्यूचे ४५ रुग्ण आढळून आले होते. तर डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. त्यानंतर २०१७ मध्ये डेंग्यूचे ७० रुग्ण आढळून आले होते. तर यावर्षीही डेंग्यूचा कोणताही उद्रेक झाला नाही, तसेच या आजाराने कोणताही मृत्यू झाला नव्हता. यावर्षी ७ मे पर्यंत डेंग्यूचा उद्रेक झाला नसून, आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये केवळ ११ रुग्ण आढळून आले आहेत. ९ जून २०१६ पासून डेंग्यू हा आजार अधिसूचित (नोटीफायेबल) घोषित झालेला आहे. त्यानुसार सर्व शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने अकोला विभागात डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे.डेंग्यूची लक्षणेडेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाचा ताप, तीव्र डोके दुखी, सांधे दुखी, अंग दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, रक्तमिश्रीत शौच होणे, रक्तातील प्लेटलेटसची संख्या कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात.डेंग्यू आजार टाळण्यासाठी उपाययोजना*घराभोवती किंवा परिसरात पाणी साचू न देणे.* साचलेले पाणी वाहते करणे.* खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे.* झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे.* आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे.डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशिल आहे. नागरिकांनी डेंग्यू टाळण्यासाठी डासांची पैदास होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. साठविलेले पाणी वाहते करणे व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळल्यास डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे शक्य आहे. डेंग्यूची लागन झालेल्या रुग्णांनी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन वैद्यकीय सल्ला व उपचार करून घ्यावेत.

- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्य सेवा (हि.) अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यdengueडेंग्यू