शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘डेंग्यू’ वर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश

By atul.jaiswal | Updated: May 16, 2018 13:46 IST

अकोला : कीटकजन्य आजारांपैकी सर्वाधिक गंभीर असलेल्या डेंग्यू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे.

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये गत दोन वर्षांपासून डेंग्यूचा कोणताही उद्रेक झाला नाही. यावर्षी आतापर्यंत केवळ ११ रुग्णांना डेंग्यू हा आजार झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने अकोला विभागात डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे.

अकोला : कीटकजन्य आजारांपैकी सर्वाधिक गंभीर असलेल्या डेंग्यू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. आरोग्य सेवा (हिवताप) अकोला मंडळांतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये गत दोन वर्षांपासून डेंग्यूचा कोणताही उद्रेक झाला नसून, यावर्षी आतापर्यंत केवळ ११ रुग्णांना डेंग्यू हा आजार झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.डेंग्यू या आजाराचा प्रसार ‘एडीस’डासाच्या मादीपासून होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे, साठविलेल्या पाण्यात या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. डेंग्यूची लागन झालेल्या रुग्णाला तीव्र स्वरूपाचा ताप येऊन रक्तातील प्लेटलेटस् कमी होतात. त्यामुळे अनेकदा हा आजार जीवघेणा सिद्ध होतो. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अकोला विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी केली जात आहे. अकोला विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वर्ष २०१६ मध्ये डेंग्यू आजाराचा एकही उद्रेक झाला नसून, डेंग्यूचे ४५ रुग्ण आढळून आले होते. तर डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. त्यानंतर २०१७ मध्ये डेंग्यूचे ७० रुग्ण आढळून आले होते. तर यावर्षीही डेंग्यूचा कोणताही उद्रेक झाला नाही, तसेच या आजाराने कोणताही मृत्यू झाला नव्हता. यावर्षी ७ मे पर्यंत डेंग्यूचा उद्रेक झाला नसून, आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये केवळ ११ रुग्ण आढळून आले आहेत. ९ जून २०१६ पासून डेंग्यू हा आजार अधिसूचित (नोटीफायेबल) घोषित झालेला आहे. त्यानुसार सर्व शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने अकोला विभागात डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे.डेंग्यूची लक्षणेडेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाचा ताप, तीव्र डोके दुखी, सांधे दुखी, अंग दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, रक्तमिश्रीत शौच होणे, रक्तातील प्लेटलेटसची संख्या कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात.डेंग्यू आजार टाळण्यासाठी उपाययोजना*घराभोवती किंवा परिसरात पाणी साचू न देणे.* साचलेले पाणी वाहते करणे.* खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे.* झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे.* आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे.डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशिल आहे. नागरिकांनी डेंग्यू टाळण्यासाठी डासांची पैदास होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. साठविलेले पाणी वाहते करणे व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळल्यास डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे शक्य आहे. डेंग्यूची लागन झालेल्या रुग्णांनी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन वैद्यकीय सल्ला व उपचार करून घ्यावेत.

- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्य सेवा (हि.) अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यdengueडेंग्यू